म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष विकोपाला गेला असून, सोमवारी मुंढे यांच्यावरून 'रामायण'वर पदाधिकाऱ्यांमध्येच महाभारत घडले. बससेवा, हरितक्षेत्र विकास आणि करवाढीबाबत एकांगी निर्णय घेणाऱ्या मुंढेंवरून भाजपच्या कोअर कमिटीतले आमदार व पदाधिकारी एकमेकांना भिडले. एकमेकांची उणीदुणी काढून असभ्य शब्दांत एकमेकांवर वार केले. हा आरडाओरडीचा 'तमाशा'पाहण्यासाठी कर्मचारी आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनाही गर्दी केल्याने पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांनी अर्ध्यावरच बैठकीतून काढता पाय घेतला. लोकप्रतिनिधी चोर आहेत का असा हल्लाबोल करीत, आमदार सानप यांनी मुंढेंची बाजू घेणाऱ्या आमदार फरांदेंवर हल्लाबोल केला. फरांदे यांनी मुंढेंची सुपारी घेतल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केला. तीनही आमदारांनी शहरासह पक्षाला वेठीस धरल्याचा थेट आरोप नगरसेवकांनी केल्याने कोणत्याही निर्णयाविना ही बैठक आटोपती घेण्याची नामुष्की भाजपवर ओढावली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर शनिवारी पक्षांतर्गत वादाचा एक अध्याय संपल्यानंतर सोमवारी पक्षाच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांच्या वादाचा दुसरा अध्याय पहायला मिळाला. महापौर रंजना भानसी यांच्या 'रामायण' या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बससेवा, हरितक्षेत्र विकास आणि करवाढीच्या विषयावरून बोलाविण्यात आलेल्या या बैठकीत आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, भाजपचे नेते विजय साने, लक्ष्मण सावजी यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. महापालिका आयुक्त मुंढे यांनी शहर बससेवेच्या ठेवलेल्या प्रस्तावावरून वादाला सुरुवात झाली. आमदार फरांदे यांनी प्रस्ताव चांगला असून, त्यांचे अभिनंदन करायला हवे असे सांगताच आमदार सानप आणि पदाधिकाऱ्यांचा संताप झाला. आमदार फरांदे यांच्या भूमिकेला सर्वच नगरसेवकांनी प्रखर विरोध केला. तुम्ही एकट्याच जाऊन मुंढेंचे अभिनंदन करा, आम्हाला सांगू नका असे सुनावले. आयुक्तांवरून तुम्ही आपली ऊर्जा वाया घालू नका, असे खडे बोल सावजी यांनी यावेळी सदस्यांना सुनावले. आयुक्तांचे काम चांगले असेल पण त्यांची वर्तणूक बरोबर नसल्याचे सांगत, नगरसेवक आणि आमदारांचीही कामे अडवण्याची हिंमत त्यांनी दाखवल्याचा संताप सानप यांनी व्यक्त केला. स्मार्ट सिटीला चाटायचे आहे का, असा सवाल करीत परस्पर डॉकेट कसे ठेवले जातात असा जाब त्यांनी महापौरांना विचारला. पक्षशिस्त जपली पाहिजे, असे सांगणाऱ्या आमदार फरांदेंना खडे बोल सुनावत, आम्हाला कसली पक्षशिस्त सुनावता तुम्ही? असा टोला लगावला.
'रामायण'वर जवळपास तासभर या पदाधिकाऱ्यांचे बंद दरवाजाआड 'महाभारत' सुरू होते. सभागृह नेते दिनकर पाटील यांनी तीन आमदारांवर राग व्यक्त केला. शेतकऱ्यांवर केलेल्या करवाढीला आपला तीव्र विरोध असल्याचे सांगत, फरांदेंनी मुंढेंची सुपारी घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला. तीन आमदारांच्या भांडणात नाशिकचे नुकसान होत असल्याचेही ते म्हणाले. आमदारांचेच एकमेकांमध्ये जमत नसल्याने पक्षांतर्गत शकले उडाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. करवाढीमुळे शेतकरी भरडला जाणार आहे. आमदार स्वार्थासाठी राजकारण करीत आहेत, असा हल्लाबोल काही सदस्यांनी बैठकीत केला. आमदार स्वतःचा विचार करतात, आपल्या कामांसाठी चार चार वेळा आयुक्तांकडे जातात आणि नगरसेवकांची कामे अडवतात असा आरोपही या बैठकीत करण्यात आला. आमदारांना नाशिककरांसह पक्षाशीही काही देणे-घेणे नसल्याचे काहींनी बोलून दाखवले. पदाधिकाऱ्यांमधील वाद इतका टोकाला गेला की, भाजपच्या जुन्या नेत्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. आताही पूर्वीची भाजप राहिली नसल्याचे खंत व्यक्त करण्यात आली. शहर बससेवेसंदर्भात विशेष महासभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार आणि पदाधिकारी यांच्यातील वादामुळे भाजपला बैठक गुंडाळण्याची वेळ आली. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे पुन्हा जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंढेंसोबत यापूर्वीही बैठका झाल्याचे सांगत कशासाठी आयुक्तांकडे जायचे, असा सवाल शिवाजी गांगुर्डे, दिनकर आढाव यांनी यावेळी आमदार फरांदेंना केला.
मुंढेंची सुपारी घेतली का?
या बैठकीत आमदार फरांदे आणि दिनकर पाटील यांच्यात टोकाचे भांडण झाले. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे नाव सांगून फरांदे दादागिरी करतात, शेतकऱ्यांवरील करवाढीला समर्थन करतात असा आरोप करीत, फरांदेंनी मुंढेंची सुपारी घेतल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. मुंढेंचा प्रस्ताव मागे घेण्यासाठी सही दिली नाही, म्हणून फरांदेंचा राग आहे असे सांगत, शेतकऱ्यांचा जीव घेऊ नका, असे खडे बोलही सुनावले. मी तुमचे ऐकण्याचा प्रश्नच नाही, असे सांगत तिघांच्या भांडणात आमचे नाव पुढे करून राजकारण खेळतात असा आरोप त्यांनी केला. आयुक्तांकडे चार-चार वेळा जाऊन स्वत:ची कामे करून घेतात, असा टोलाही लगावला.
आमदार फरांदे एकाकी
पुढील महासभेत बससेवेचा प्रस्ताव दाखल झाल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी भाजपने बोलविलेल्या बैठकीत नियमित विषय बाजूला राहून शहरातील तीन आमदारांविरुद्ध पदाधिकारी यांच्यातच वादावादी झाली. आमदार बाळासाहेब सानप आणि देवयानी फरांदे यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या. महापौरांच्या 'रामायण' निवासस्थानी बंद दरवाजाआड झालेल्या वादातून भाजपची पक्षांतर्गत लक्तरे उडाल्याचे दिसून आले. आमदार फरांदे यांच्याविरोधात सर्व पक्षातील नेते असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे मुंढेंवरून फरांदे एकाकी पडल्याचे चित्र होते.
आधी लोकांमधून निवडून या!
भाजपचे सरचिटणीस लक्ष्मण सावजी आणि दिनकर पाटील यांच्यातही जोरदार खडाजंगी झाली. पाटील यांना पक्ष शिस्त शिकवणाऱ्या सावजींना पाटलांनी कडक शब्दांत सुनावले. अगोदर तुम्ही लोकांमधून निवडून या, मग बोला असा टोला लगावत आम्हाला का बोलू देत नाही, असा सवाल केला. तुम्ही तुमचा स्वार्थ बघता, नगरसेवकांचा विचार कोणी करायला तयार नाही, असेही ते म्हणाले. प्रत्येक जण स्वत:ची कामे करून घेतो. नगरसेवकांना वाऱ्यावर सोडल्याचे ते म्हणाले.
पक्षातून काढून टाका
तीनही आमदारांच्या संघर्षावरून पाटील यांचा रौद्रावतार रामायणवर पहायला मिळाला. तुम्ही काँग्रेसमधून आला आहात, असा आरोप करणाऱ्या आमदार फरांदेंना तुमच्यात हिम्मत असेल तर मला पक्षातून काढून टाका असे आवाहन पाटील यांनी फरांदेना दिले. तुम्हीच आम्हाला पक्षात घेतले, आता तुम्हीच काढून दाखवा असे खुले आव्हान देत आम्ही दमदाटी सहन करून घेणार नाही, असे खडे बोल पाटील यांनी सुनावले.
फक्त सह्या करून घेतात!
या बैठकीत महासभा काढण्यावरून सावजी आणि साने यांनी महापौरांना जाब विचारला. डॉकेट तुम्हाला माहीत नसतानाही, तुम्ही सभा काढलीच कशी असा जाब विचारला.
त्यावर महापौर रंजना भानसी यांनी माझ्याकडून फक्त सह्या घेतात, असे सांगून आपली हतबलता व्यक्त केली. महापौरांना शब्दभरसुद्धा विचारले जात नाही, असे काही ज्येष्ठ सदस्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनच सगळे श्रेय घेण्याचे काम करीत आहे, असा आरोप सुनील बागूल यांनी केला. आम्ही फक्त महासभेत बसायला येतो असा टोला सतीश कुलकर्णी यांनी लगावला.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवरून भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष विकोपाला गेला असून, सोमवारी मुंढे यांच्यावरून 'रामायण'वर पदाधिकाऱ्यांमध्येच महाभारत घडले. बससेवा, हरितक्षेत्र विकास आणि करवाढीबाबत एकांगी निर्णय घेणाऱ्या मुंढेंवरून भाजपच्या कोअर कमिटीतले आमदार व पदाधिकारी एकमेकांना भिडले. एकमेकांची उणीदुणी काढून असभ्य शब्दांत एकमेकांवर वार केले. हा आरडाओरडीचा 'तमाशा'पाहण्यासाठी कर्मचारी आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनाही गर्दी केल्याने पक्षाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांनी अर्ध्यावरच बैठकीतून काढता पाय घेतला. लोकप्रतिनिधी चोर आहेत का असा हल्लाबोल करीत, आमदार सानप यांनी मुंढेंची बाजू घेणाऱ्या आमदार फरांदेंवर हल्लाबोल केला. फरांदे यांनी मुंढेंची सुपारी घेतल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केला. तीनही आमदारांनी शहरासह पक्षाला वेठीस धरल्याचा थेट आरोप नगरसेवकांनी केल्याने कोणत्याही निर्णयाविना ही बैठक आटोपती घेण्याची नामुष्की भाजपवर ओढावली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर शनिवारी पक्षांतर्गत वादाचा एक अध्याय संपल्यानंतर सोमवारी पक्षाच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांच्या वादाचा दुसरा अध्याय पहायला मिळाला. महापौर रंजना भानसी यांच्या 'रामायण' या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बससेवा, हरितक्षेत्र विकास आणि करवाढीच्या विषयावरून बोलाविण्यात आलेल्या या बैठकीत आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, भाजपचे नेते विजय साने, लक्ष्मण सावजी यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. महापालिका आयुक्त मुंढे यांनी शहर बससेवेच्या ठेवलेल्या प्रस्तावावरून वादाला सुरुवात झाली. आमदार फरांदे यांनी प्रस्ताव चांगला असून, त्यांचे अभिनंदन करायला हवे असे सांगताच आमदार सानप आणि पदाधिकाऱ्यांचा संताप झाला. आमदार फरांदे यांच्या भूमिकेला सर्वच नगरसेवकांनी प्रखर विरोध केला. तुम्ही एकट्याच जाऊन मुंढेंचे अभिनंदन करा, आम्हाला सांगू नका असे सुनावले. आयुक्तांवरून तुम्ही आपली ऊर्जा वाया घालू नका, असे खडे बोल सावजी यांनी यावेळी सदस्यांना सुनावले. आयुक्तांचे काम चांगले असेल पण त्यांची वर्तणूक बरोबर नसल्याचे सांगत, नगरसेवक आणि आमदारांचीही कामे अडवण्याची हिंमत त्यांनी दाखवल्याचा संताप सानप यांनी व्यक्त केला. स्मार्ट सिटीला चाटायचे आहे का, असा सवाल करीत परस्पर डॉकेट कसे ठेवले जातात असा जाब त्यांनी महापौरांना विचारला. पक्षशिस्त जपली पाहिजे, असे सांगणाऱ्या आमदार फरांदेंना खडे बोल सुनावत, आम्हाला कसली पक्षशिस्त सुनावता तुम्ही? असा टोला लगावला.
'रामायण'वर जवळपास तासभर या पदाधिकाऱ्यांचे बंद दरवाजाआड 'महाभारत' सुरू होते. सभागृह नेते दिनकर पाटील यांनी तीन आमदारांवर राग व्यक्त केला. शेतकऱ्यांवर केलेल्या करवाढीला आपला तीव्र विरोध असल्याचे सांगत, फरांदेंनी मुंढेंची सुपारी घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला. तीन आमदारांच्या भांडणात नाशिकचे नुकसान होत असल्याचेही ते म्हणाले. आमदारांचेच एकमेकांमध्ये जमत नसल्याने पक्षांतर्गत शकले उडाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. करवाढीमुळे शेतकरी भरडला जाणार आहे. आमदार स्वार्थासाठी राजकारण करीत आहेत, असा हल्लाबोल काही सदस्यांनी बैठकीत केला. आमदार स्वतःचा विचार करतात, आपल्या कामांसाठी चार चार वेळा आयुक्तांकडे जातात आणि नगरसेवकांची कामे अडवतात असा आरोपही या बैठकीत करण्यात आला. आमदारांना नाशिककरांसह पक्षाशीही काही देणे-घेणे नसल्याचे काहींनी बोलून दाखवले. पदाधिकाऱ्यांमधील वाद इतका टोकाला गेला की, भाजपच्या जुन्या नेत्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. आताही पूर्वीची भाजप राहिली नसल्याचे खंत व्यक्त करण्यात आली. शहर बससेवेसंदर्भात विशेष महासभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार आणि पदाधिकारी यांच्यातील वादामुळे भाजपला बैठक गुंडाळण्याची वेळ आली. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे पुन्हा जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंढेंसोबत यापूर्वीही बैठका झाल्याचे सांगत कशासाठी आयुक्तांकडे जायचे, असा सवाल शिवाजी गांगुर्डे, दिनकर आढाव यांनी यावेळी आमदार फरांदेंना केला.
मुंढेंची सुपारी घेतली का?
या बैठकीत आमदार फरांदे आणि दिनकर पाटील यांच्यात टोकाचे भांडण झाले. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे नाव सांगून फरांदे दादागिरी करतात, शेतकऱ्यांवरील करवाढीला समर्थन करतात असा आरोप करीत, फरांदेंनी मुंढेंची सुपारी घेतल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. मुंढेंचा प्रस्ताव मागे घेण्यासाठी सही दिली नाही, म्हणून फरांदेंचा राग आहे असे सांगत, शेतकऱ्यांचा जीव घेऊ नका, असे खडे बोलही सुनावले. मी तुमचे ऐकण्याचा प्रश्नच नाही, असे सांगत तिघांच्या भांडणात आमचे नाव पुढे करून राजकारण खेळतात असा आरोप त्यांनी केला. आयुक्तांकडे चार-चार वेळा जाऊन स्वत:ची कामे करून घेतात, असा टोलाही लगावला.
आमदार फरांदे एकाकी
पुढील महासभेत बससेवेचा प्रस्ताव दाखल झाल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी भाजपने बोलविलेल्या बैठकीत नियमित विषय बाजूला राहून शहरातील तीन आमदारांविरुद्ध पदाधिकारी यांच्यातच वादावादी झाली. आमदार बाळासाहेब सानप आणि देवयानी फरांदे यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या. महापौरांच्या 'रामायण' निवासस्थानी बंद दरवाजाआड झालेल्या वादातून भाजपची पक्षांतर्गत लक्तरे उडाल्याचे दिसून आले. आमदार फरांदे यांच्याविरोधात सर्व पक्षातील नेते असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे मुंढेंवरून फरांदे एकाकी पडल्याचे चित्र होते.
आधी लोकांमधून निवडून या!
भाजपचे सरचिटणीस लक्ष्मण सावजी आणि दिनकर पाटील यांच्यातही जोरदार खडाजंगी झाली. पाटील यांना पक्ष शिस्त शिकवणाऱ्या सावजींना पाटलांनी कडक शब्दांत सुनावले. अगोदर तुम्ही लोकांमधून निवडून या, मग बोला असा टोला लगावत आम्हाला का बोलू देत नाही, असा सवाल केला. तुम्ही तुमचा स्वार्थ बघता, नगरसेवकांचा विचार कोणी करायला तयार नाही, असेही ते म्हणाले. प्रत्येक जण स्वत:ची कामे करून घेतो. नगरसेवकांना वाऱ्यावर सोडल्याचे ते म्हणाले.
पक्षातून काढून टाका
तीनही आमदारांच्या संघर्षावरून पाटील यांचा रौद्रावतार रामायणवर पहायला मिळाला. तुम्ही काँग्रेसमधून आला आहात, असा आरोप करणाऱ्या आमदार फरांदेंना तुमच्यात हिम्मत असेल तर मला पक्षातून काढून टाका असे आवाहन पाटील यांनी फरांदेना दिले. तुम्हीच आम्हाला पक्षात घेतले, आता तुम्हीच काढून दाखवा असे खुले आव्हान देत आम्ही दमदाटी सहन करून घेणार नाही, असे खडे बोल पाटील यांनी सुनावले.
फक्त सह्या करून घेतात!
या बैठकीत महासभा काढण्यावरून सावजी आणि साने यांनी महापौरांना जाब विचारला. डॉकेट तुम्हाला माहीत नसतानाही, तुम्ही सभा काढलीच कशी असा जाब विचारला.
त्यावर महापौर रंजना भानसी यांनी माझ्याकडून फक्त सह्या घेतात, असे सांगून आपली हतबलता व्यक्त केली. महापौरांना शब्दभरसुद्धा विचारले जात नाही, असे काही ज्येष्ठ सदस्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनच सगळे श्रेय घेण्याचे काम करीत आहे, असा आरोप सुनील बागूल यांनी केला. आम्ही फक्त महासभेत बसायला येतो असा टोला सतीश कुलकर्णी यांनी लगावला.