सटाणा : परतीच्या पावसामुळे बागलाणसह मालेगाव तालुक्यात झालेल्या द्राक्ष पिकांच्या नुकसानीची तीव्रता भयानक असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार दिलीप बोरसे यांना दिले. कसमादे परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे द्राक्ष बागांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या संदर्भात खासदार डॉ. सुभाष भामरे आणि तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार दिलीप बोरसे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर केला.
नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
परतीच्या पावसामुळे बागलाणसह मालेगाव तालुक्यात झालेल्या द्राक्ष पिकांच्या नुकसानीची तीव्रता भयानक असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत उपलब्ध करून ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Oct 2019, 4:00 am