नाशिक: विदेशातून कांदा आयात करण्याच्या निर्णयाला विरोध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदे फेकण्याचा आणि यात्रा अडवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी आणि विविध संघटनांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतलं असून, १२५ आंदोलकांना नोटिसा धाडल्या आहेत. तर काल रात्री उशिरापर्यंत १५ आंदोलकांना स्थानबद्ध केलं आहे.
पाकिस्तानसह इजिप्त, चीनमधून कांदा आयात करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अन्यथा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदेफेक करण्याचा आणि यात्रा अडवण्याचा इशारा शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी दिला आहे. आंदोलनाचा इशारा देणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर महाजनादेश यात्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून १२५ आंदोलकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. काल रात्री उशिरापर्यंत १५ जणांना स्थानबद्द करण्यात आलं आहे. तर परिवर्तनवादी संघटना, आप युवा आघाडी, प्रहार जनशक्ती, छात्रभारती संघटनांनी गनिमी काव्यानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह २२ जणांना आज पहाटेच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतं. दरम्यान आतापर्यंत पोलिसांनी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या ६२ जणांना स्थानबद्ध केल्याची माहिती आहे.
महाजनादेश यात्रेवर बरसणार कांदे
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर पावसाचे सावट
ठळक मुद्दे:
>> यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत फलक
>> मार्गावरील शाळांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर
>> बॉम्ब शोध पथकाकडून मुख्य रस्त्यावर पाहणी
>> महाजनादेश यात्रेसाठी शहर स्वछ
>> मुख्य बाजारपेठेतील सर्व अतिक्रमणे हटवली
>> रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलीस तैनात
पाकिस्तानसह इजिप्त, चीनमधून कांदा आयात करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अन्यथा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वाहनांवर कांदेफेक करण्याचा आणि यात्रा अडवण्याचा इशारा शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी दिला आहे. आंदोलनाचा इशारा देणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर महाजनादेश यात्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून १२५ आंदोलकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. काल रात्री उशिरापर्यंत १५ जणांना स्थानबद्द करण्यात आलं आहे. तर परिवर्तनवादी संघटना, आप युवा आघाडी, प्रहार जनशक्ती, छात्रभारती संघटनांनी गनिमी काव्यानं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्यासह २२ जणांना आज पहाटेच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतं. दरम्यान आतापर्यंत पोलिसांनी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या ६२ जणांना स्थानबद्ध केल्याची माहिती आहे.
महाजनादेश यात्रेवर बरसणार कांदे
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर पावसाचे सावट
ठळक मुद्दे:
>> यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत फलक
>> मार्गावरील शाळांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर
>> बॉम्ब शोध पथकाकडून मुख्य रस्त्यावर पाहणी
>> महाजनादेश यात्रेसाठी शहर स्वछ
>> मुख्य बाजारपेठेतील सर्व अतिक्रमणे हटवली
>> रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलीस तैनात