म. टा. प्रतिनिधी, नाशिक: गेल्या आठवड्यापासून पारा घसरला असून हवेत गारवा जाणवू लागला आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सध्या शहरवासीयांना सर्दी, खोकला, ताप, अपचनाचा त्रास, हात-पाय दुखणे अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. काहींचा ताप पाच ते सहा दिवस राहत असल्याच्या तक्रारींतही वाढ झाली आहे. त्यामुळे व्यायामासह योग्य आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
बदलत्या वातावरणामुळे तापमान कमी-अधिक होत आहे. दुपारी कडक ऊन तर सकाळी आणि सायंकाळी गारवा जाणवत असल्याने आजार बळावत आहेत. विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे. दररोज ओपीडीमध्ये दहाच्या आसपास रुग्ण सर्दी, खोकला आणि तापाच्या आजारांचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. आहारात डिंकाचे लाडू, तूप, बाजरी, मका, पालेभाज्या, मांसाहार तसेच हिंग, धने, जिरे, तेजपत्ता यांसारख्या मसाल्यांपासून बनविलेल्या पदार्थांचे सेवन वाढवावे असे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी असेल्यांना सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्या जाणवत आहेत. अशा परिस्थितीत योग्य आहार, विहारासह पाणीही उकळून प्यावे असा सल्लाही डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. दिवसभर कोमट पाणी घ्यावे याचबरोबर थंड पदार्थांचे सेवन टाळावे, असेही सांगण्यात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापाचे सर्वाधिक रुग्ण येत आहेत. वातावरणातील बदलांमुळे हे आजार होतात. सर्दी, खोकला, ताप, अपचन यांसारख्या आजारांसाठी हे वातावरण पोषक आहे. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. जयंत भोसले
बदलत्या वातावरणामुळे तापमान कमी-अधिक होत आहे. दुपारी कडक ऊन तर सकाळी आणि सायंकाळी गारवा जाणवत असल्याने आजार बळावत आहेत. विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे. दररोज ओपीडीमध्ये दहाच्या आसपास रुग्ण सर्दी, खोकला आणि तापाच्या आजारांचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. आहारात डिंकाचे लाडू, तूप, बाजरी, मका, पालेभाज्या, मांसाहार तसेच हिंग, धने, जिरे, तेजपत्ता यांसारख्या मसाल्यांपासून बनविलेल्या पदार्थांचे सेवन वाढवावे असे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी असेल्यांना सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्या जाणवत आहेत. अशा परिस्थितीत योग्य आहार, विहारासह पाणीही उकळून प्यावे असा सल्लाही डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. दिवसभर कोमट पाणी घ्यावे याचबरोबर थंड पदार्थांचे सेवन टाळावे, असेही सांगण्यात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापाचे सर्वाधिक रुग्ण येत आहेत. वातावरणातील बदलांमुळे हे आजार होतात. सर्दी, खोकला, ताप, अपचन यांसारख्या आजारांसाठी हे वातावरण पोषक आहे. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. जयंत भोसले