म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक/ निफाड
पालखेड डाव्या कालव्यातून येवला, मनमाडसह ३५ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी येत्या दोन ते तीन दिवसात आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी डाव्या कालव्याची पाहणी केली. पाणीचोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात १२०० डोंगळे काढले. दोन दिवस ही कारवाई अशीच सुरू राहणार असून त्यानंतर पाणी सोडले जाणार आहे. यावेळी कटेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
पालखेड धरणातून कालव्याद्वारे हे पाणी सोडल्यानंतर मनमाडच्या साठवणूक तलावात जाण्यासाठी ७४ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तर येवला येथे जाण्यासाठी या पाण्याला पुढचा ५ ते ६ किलोमीटर अधिक लागते. पण, या दरम्यान या कालव्यातून मोठ्या प्रमाणात डोंगळे लावून शेतीसाठी पाण्याची चोरी केली जाते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी अगोदरच काळजी घेतली आहे.
पालखेडहून ७५० दशलक्ष घनफुटाचे हे रोटेशन असणार असून त्यासाठी दहा दिवस पाणी सोडले जाणार आहे. येवला, मनमाड नगरपरिषद, मनमाड रेल्वे, लासलगाव, निफाडमधील काही प्रासंगिक गावांना पालखेड कालव्यात पाणी आरक्षित असते. त्यातून हे पाणी सोडले जाणार आहे. विशेष म्हणजे खास पिण्यासाठीच हे आवर्तन असले तरी शेतीसाठी पाणी चोरी जाऊ नये याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते आहे.
पालखेड डाव्या कालव्यातून येवला, मनमाडसह ३५ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी येत्या दोन ते तीन दिवसात आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी डाव्या कालव्याची पाहणी केली. पाणीचोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात १२०० डोंगळे काढले. दोन दिवस ही कारवाई अशीच सुरू राहणार असून त्यानंतर पाणी सोडले जाणार आहे. यावेळी कटेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
पालखेड धरणातून कालव्याद्वारे हे पाणी सोडल्यानंतर मनमाडच्या साठवणूक तलावात जाण्यासाठी ७४ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तर येवला येथे जाण्यासाठी या पाण्याला पुढचा ५ ते ६ किलोमीटर अधिक लागते. पण, या दरम्यान या कालव्यातून मोठ्या प्रमाणात डोंगळे लावून शेतीसाठी पाण्याची चोरी केली जाते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी अगोदरच काळजी घेतली आहे.
पालखेडहून ७५० दशलक्ष घनफुटाचे हे रोटेशन असणार असून त्यासाठी दहा दिवस पाणी सोडले जाणार आहे. येवला, मनमाड नगरपरिषद, मनमाड रेल्वे, लासलगाव, निफाडमधील काही प्रासंगिक गावांना पालखेड कालव्यात पाणी आरक्षित असते. त्यातून हे पाणी सोडले जाणार आहे. विशेष म्हणजे खास पिण्यासाठीच हे आवर्तन असले तरी शेतीसाठी पाणी चोरी जाऊ नये याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते आहे.