म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भुवनेश्वरी एस. यांच्या कामकाजावर असमाधान व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्याकडे शुक्रवारी तक्रार केली. त्यानंतर आयुक्तांनी चौकशी समिती नेमली असून, ही समिती आता चौकशी करणार आहे. या समितीत सहा सदस्यांचा समावेश असून १५ दिवसात ही चौकशी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
या समितीत विभागीय आयुक्त कार्यालयाचे विकास योजना उपायुक्त ए. एस. मोरे, नियोजन उपायुक्त प्रदीप पोतदार, सहाय्यक आयुक्त (तपासणी) एस. जी. सांगळे, सहाय्यक संचालक (विकास) चंद्रकांत वानखेडे, सहाय्यक लेखा अधिकारी विकास आस्थापना एस. डी. जगताप, सहाय्यक अधिकारी (प्रशासन) शरद पवार यांचा समावेश आहे. अखर्चित निधी या तक्रारीत मुख्य मुद्दा आहे. त्याचप्रमाणे कामांच्या बाबतीतही तक्रार आहे.