म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प भगवान गौतम बुद्धांनी मानवाच्या कल्याणासाठी शांतीचा मार्ग सांगितला असून त्यासाठी मंगल कर्मामध्ये नमूद असलेल्या ३८ मार्गाचा अवलंब केल्यास निश्चितच फायदा होईल असे बौद्धाचार्य रवींद्र कटारे यांनी सांगितले. देवळालीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने बौद्धविहार येथे सकाळी परिसरातील उपासक उपसिकांनी एकत्र येत त्रिशरण, पंचशील, बौद्ध व भीमवंदना गायली. यावेळी उपस्थित बुद्ध विहार समितीचे चेअरमन विश्वनाथ काळे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देताना प्रत्येकाने विहारात येताना मानपान घेऊ नये. सर्वांच्या सहकार्यातून धम्माचे मोठे कार्य उभे होणार आहे. यावेळी भाऊसाहेब धिवरे, जयंती अध्यक्ष संतोष कटारे, शहराध्यक्ष सुरेश निकम, शैलेश भालेराव आदींसह महिला वर्ग उपस्थित होता. सांयकाळी पुन्हा सर्व समाजबांधवांनी एकत्र येत शहरातून धम्मरॅली काढत सामाजिक सलोखा, शांतता आणि बंधुभाव वृद्धिंगत होवो असा संदेश या रॅलीतून दिला. त्यानंतर जुने बसस्थानक परिसरात विविध मान्यवरांच्या हस्ते भव्य खिरदान वाटप कार्यक्रम पार पडला. आकर्षक रांगोळी यावेळी विहारात सकाळपासून आर्मी पब्लिक स्कूलचे कलाशिक्षक सुरेश म्हैसधुणे यांनी आकर्षक रंगात भगवान गौतम बुद्धांची साकारलेली रांगोळी प्रेक्षणीय ठरली. त्यासाठी तब्बल ३ तास मेहनत घेत ही रांगोळी साकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
'मंगल कर्माचे आचरण करा'
म टा...
MT 19 May 2019, 4:00 am