म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासह वाढत्या अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. अवैध धंद्यांबाबत तक्रारी करण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी सांगितल.
जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनातील सर्व विभागांची समन्वय बैठक नुकतीच पार पडली होती. बैठकीत समन्वय कक्ष स्थापना करण्याचे ठरले होते. त्यानुसार हा कक्ष स्थापन करण्यात आला असून, सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याचे काम या कक्षामार्फत केले जाणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे या कक्षाचे प्रमुख समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशानदार, ग्रामीण पोलिस दलातील सहायक अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक बिसन भूतकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक के. एम. वीरकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, अन्न व औषध निरीक्षक चंद्रकांत मोरे, अमित रासकर हे या समन्वय कक्षाचे सदस्य असणार आहेत.
लगेच घेतली जाणार दखल
या कक्षात नागरिकांकडून आलेल्या केवळ अवैध धंद्यांबाबतच्याच तक्रारी नोंदविल्या जातील आणि संबंधित विभागाच्या इ-मेलवर तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तत्काळ कार्यवाहीसाठी तक्रार पाठविली जाईल. संबंधित विभाग दिलेल्या त्या तक्रारींवर कार्यवाही करून समन्वय कक्षाच्या इ मेलवर कार्यपूर्ती अहवाल पाठवतील असे मांढरे यांनी कळविले आहे.
थेट करा तक्रार
नागरिकांना जिल्ह्यात काही अवैध घटना घडत असल्याची माहिती मिळाल्यास त्यांनी याबाबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. तक्रार करताना घटना कोठे, कधी, काय याचा तपशील द्यावा असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अशी करा तक्रार
या समन्वय कक्षाचा मोबाइल क्रमांक ०९४०५८६९९४० हा असून, इ मेल आयडी nashikhb123@gmail.com हा आहे. दिलेल्या क्रमांकावर केवळ अवैध धंद्यांच्याच तक्रारी स्वीकारल्या जातील असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासह वाढत्या अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. अवैध धंद्यांबाबत तक्रारी करण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी सांगितल.
जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनातील सर्व विभागांची समन्वय बैठक नुकतीच पार पडली होती. बैठकीत समन्वय कक्ष स्थापना करण्याचे ठरले होते. त्यानुसार हा कक्ष स्थापन करण्यात आला असून, सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याचे काम या कक्षामार्फत केले जाणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे या कक्षाचे प्रमुख समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे उपायुक्त संग्रामसिंह निशानदार, ग्रामीण पोलिस दलातील सहायक अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक बिसन भूतकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक के. एम. वीरकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, अन्न व औषध निरीक्षक चंद्रकांत मोरे, अमित रासकर हे या समन्वय कक्षाचे सदस्य असणार आहेत.
लगेच घेतली जाणार दखल
या कक्षात नागरिकांकडून आलेल्या केवळ अवैध धंद्यांबाबतच्याच तक्रारी नोंदविल्या जातील आणि संबंधित विभागाच्या इ-मेलवर तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तत्काळ कार्यवाहीसाठी तक्रार पाठविली जाईल. संबंधित विभाग दिलेल्या त्या तक्रारींवर कार्यवाही करून समन्वय कक्षाच्या इ मेलवर कार्यपूर्ती अहवाल पाठवतील असे मांढरे यांनी कळविले आहे.
थेट करा तक्रार
नागरिकांना जिल्ह्यात काही अवैध घटना घडत असल्याची माहिती मिळाल्यास त्यांनी याबाबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. तक्रार करताना घटना कोठे, कधी, काय याचा तपशील द्यावा असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अशी करा तक्रार
या समन्वय कक्षाचा मोबाइल क्रमांक ०९४०५८६९९४० हा असून, इ मेल आयडी nashikhb123@gmail.com हा आहे. दिलेल्या क्रमांकावर केवळ अवैध धंद्यांच्याच तक्रारी स्वीकारल्या जातील असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी स्पष्ट केले.