निपुंगे यांच्या तक्रारीवर पोलिस आयुक्तांची स्पष्टोक्ती
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात सहाय्यक पोलिस अधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीबाबतचा निर्णय पोलिस महासंचालक घेतील. तक्रारीचा आशय नाशिकशी संबंधित नाही, असे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी स्पष्ट केले.
वाहतूक शाखेतील आर्थिक गैरव्यवहारास विरोध केल्याने ठाण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महिला कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात नाहक अडकविल्याचा आरोप निपुंगे यांनी केला आहे. भिवंडी येथील वाहतूक विभागाची आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी केल्याचा राग मनात ठेवून सिंग यांनी २०१७ मध्ये ठाणे पोलिस दलातील महिला कर्मचारी सुभद्रा पवार मृत्यूप्रकरणात खोटा गुन्हा दाखल केला. हत्या झालेली असताना पवारची आत्महत्या असल्याचे भासविण्यात आले. सिंग यांच्यासह त्यावेळी कर्तव्यावर असलेले इतर अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र निपुंगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, शहर पोलिस आयुक्तांना दिले. याबाबत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले की, तक्रारीचा आशय लक्षात घेता सर्व घडामोडी ठाणे शहरात घडल्याचे दिसते. त्यात नाशिकचा संबंध नाही. त्यामुळे तक्रार अर्ज पोलिस महासंचालकांना पाठवण्यात आला आहे. पोलिस महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले तर चौकशी करून अहवाल सादर करू असे पांडे यांनी स्पष्ट केले.
झिरवाळांचे पत्र
दरम्यान, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना या प्रकरणी चौकशीचे पत्र दिले. निपुंगे यांनी अनुसूचित जमाती कायद्यान्वये १४ जून रोजी तक्रार दिल्यानंतर आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे ही बाब अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ४ चे उल्लंघन असून, या प्रकरणात तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहेत. मात्र, असे पत्र अद्याप मिळाले नसल्याचे आयुक्त पांडे यांनी सांगितले.
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात सहाय्यक पोलिस अधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीबाबतचा निर्णय पोलिस महासंचालक घेतील. तक्रारीचा आशय नाशिकशी संबंधित नाही, असे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी स्पष्ट केले.
वाहतूक शाखेतील आर्थिक गैरव्यवहारास विरोध केल्याने ठाण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महिला कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात नाहक अडकविल्याचा आरोप निपुंगे यांनी केला आहे. भिवंडी येथील वाहतूक विभागाची आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी केल्याचा राग मनात ठेवून सिंग यांनी २०१७ मध्ये ठाणे पोलिस दलातील महिला कर्मचारी सुभद्रा पवार मृत्यूप्रकरणात खोटा गुन्हा दाखल केला. हत्या झालेली असताना पवारची आत्महत्या असल्याचे भासविण्यात आले. सिंग यांच्यासह त्यावेळी कर्तव्यावर असलेले इतर अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र निपुंगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, शहर पोलिस आयुक्तांना दिले. याबाबत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले की, तक्रारीचा आशय लक्षात घेता सर्व घडामोडी ठाणे शहरात घडल्याचे दिसते. त्यात नाशिकचा संबंध नाही. त्यामुळे तक्रार अर्ज पोलिस महासंचालकांना पाठवण्यात आला आहे. पोलिस महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले तर चौकशी करून अहवाल सादर करू असे पांडे यांनी स्पष्ट केले.
झिरवाळांचे पत्र
दरम्यान, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना या प्रकरणी चौकशीचे पत्र दिले. निपुंगे यांनी अनुसूचित जमाती कायद्यान्वये १४ जून रोजी तक्रार दिल्यानंतर आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे ही बाब अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ४ चे उल्लंघन असून, या प्रकरणात तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहेत. मात्र, असे पत्र अद्याप मिळाले नसल्याचे आयुक्त पांडे यांनी सांगितले.