म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली या 'जत्रा' चित्रपटाच्या गाण्याने अवघ्या मराठी मनाला भुरळ घातली. पण, याच कोंबड्यांच्या त्रासामुळे सध्या नाशिक महानगरपालिकेच्या एका नगरसेविकेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. या कोंबड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामीण विभागातील अधिकारी टाळाटाळ करीत असल्यामुळे त्यांनी आता याची थेट तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
संगिता अमोल जाधव या शिवसेनेच्या नगरसेविका असल्या तरी त्यांची ही तक्रार तालुक्यातील विल्होळी जवळील आंबे बहुला येथील आपल्या जागेच्या शेजाऱ्याबाबत आहे. शेजारच्या या जागेवर पोल्ट्री फार्म असल्यामुळे त्यातून त्यांच्या जागेवर राहणाऱ्या वॉचमन व कामगारांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी ही तक्रार अगोदर जिल्हा परिषदेकडे केली. पण, येथे टोलवाटोलवी केल्यानंतर त्यांनी अशोस्तंभजवळील पशुसंवर्धन खात्याला दिली. त्यांनी हा विषय टोलवला. त्यामुळे जाधव यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व त्यांनी ही रितसर तक्रार केली. विशेष म्हणजे जाधव यांनी ही तक्रार त्यांच्या नगरसेविकांच्या लेटरहेडवर केल्यामुळे त्यांना 'अहो, मनपाकडे तक्रार करा', असा सल्लाही काही अधिकाऱ्यांनी दिला. ही सर्व टोलवाटोलवी आणि त्यात कोंबड्याच्या त्रास यामुळे जाधव यांना मनस्ताप सहन करावा लागला.
जाधव यांनी केलेल्या तक्रारीत शेजारच्या जागा मालकाने आपली जागा एकाला भाड्याने दिली आहे. या भाडेकरुने येथे थेट बेकादेशीर कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. येथे मोठ्या प्रमाणात कोंबड्या आहेत. कोंबड्या मेल्यानंतर येथे मोठी दुर्गंधी पसरते व आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मेलेल्या कोंबड्यांच्या पिसांमुळे माशांचे प्रमाणही वाढले आहे. या जागेच्या मागे पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे. या तलावात मोकाट कुत्री मेलेल्या कोंबड्या घेवून जातात. त्यामुळे पाणीही खराब होत असल्याचे म्हटले आहे. या तक्रारीनंतर आता प्रशासन काय कारवाई करते हे महत्त्वाचे आहे.
कोंबड्यांमुळे आमच्या जागेवर असलेल्या वॉचमन, कामगार व रहिवाशांना त्रास होतो. हा विषय मनपा हद्दीतील नाही. तर तो ग्रामीण भागातील आहे. त्याबद्दल तक्रार केल्यानंतर अधिकारी टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे याची तक्रार आता जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
--संगिता अमोल जाधव, नगरसेविका
कोंबडी पळाली, तंगडी धरून, लंगडी घालाय लागली या 'जत्रा' चित्रपटाच्या गाण्याने अवघ्या मराठी मनाला भुरळ घातली. पण, याच कोंबड्यांच्या त्रासामुळे सध्या नाशिक महानगरपालिकेच्या एका नगरसेविकेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. या कोंबड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामीण विभागातील अधिकारी टाळाटाळ करीत असल्यामुळे त्यांनी आता याची थेट तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
संगिता अमोल जाधव या शिवसेनेच्या नगरसेविका असल्या तरी त्यांची ही तक्रार तालुक्यातील विल्होळी जवळील आंबे बहुला येथील आपल्या जागेच्या शेजाऱ्याबाबत आहे. शेजारच्या या जागेवर पोल्ट्री फार्म असल्यामुळे त्यातून त्यांच्या जागेवर राहणाऱ्या वॉचमन व कामगारांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी ही तक्रार अगोदर जिल्हा परिषदेकडे केली. पण, येथे टोलवाटोलवी केल्यानंतर त्यांनी अशोस्तंभजवळील पशुसंवर्धन खात्याला दिली. त्यांनी हा विषय टोलवला. त्यामुळे जाधव यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व त्यांनी ही रितसर तक्रार केली. विशेष म्हणजे जाधव यांनी ही तक्रार त्यांच्या नगरसेविकांच्या लेटरहेडवर केल्यामुळे त्यांना 'अहो, मनपाकडे तक्रार करा', असा सल्लाही काही अधिकाऱ्यांनी दिला. ही सर्व टोलवाटोलवी आणि त्यात कोंबड्याच्या त्रास यामुळे जाधव यांना मनस्ताप सहन करावा लागला.
जाधव यांनी केलेल्या तक्रारीत शेजारच्या जागा मालकाने आपली जागा एकाला भाड्याने दिली आहे. या भाडेकरुने येथे थेट बेकादेशीर कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला आहे. येथे मोठ्या प्रमाणात कोंबड्या आहेत. कोंबड्या मेल्यानंतर येथे मोठी दुर्गंधी पसरते व आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मेलेल्या कोंबड्यांच्या पिसांमुळे माशांचे प्रमाणही वाढले आहे. या जागेच्या मागे पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे. या तलावात मोकाट कुत्री मेलेल्या कोंबड्या घेवून जातात. त्यामुळे पाणीही खराब होत असल्याचे म्हटले आहे. या तक्रारीनंतर आता प्रशासन काय कारवाई करते हे महत्त्वाचे आहे.
कोंबड्यांमुळे आमच्या जागेवर असलेल्या वॉचमन, कामगार व रहिवाशांना त्रास होतो. हा विषय मनपा हद्दीतील नाही. तर तो ग्रामीण भागातील आहे. त्याबद्दल तक्रार केल्यानंतर अधिकारी टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे याची तक्रार आता जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
--संगिता अमोल जाधव, नगरसेविका