घोटी : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत इगतपुरी तालुक्यातील वाडिऱ्हे गावापासून जवळच असलेल्या गडगड सांगवी येथील दुर्लक्षित किल्ल्यावर घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भागीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मंडळाचे कार्यकर्ते पहाटेच गडावर पोहोचले. कठीण व अडचणीचा असलेला किल्ला सर केल्यावर त्यांनी किल्ल्यावरील भवानी मातेच्या मंदिराची साफसफाई केली. त्यानंतर दहीहंडीचे पूजन करून 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' हा संदेश देत लहान मुलींच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष भागीरथ मराडे, अभिजीत कुलकर्णी, आत्माराम मते, बाळू आरोटे, अशोक हेमके, संतोष म्हसणे उपस्थित होते.
गडगड सांगवी किल्ल्यावर दहीहंडी
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत इगतपुरी तालुक्यातील वाडिऱ्हे गावापासून जवळच असलेल्या गडगड सांगवी येथील दुर्लक्षित किल्ल्यावर घोटीतील कळसुबाई ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Aug 2019, 4:00 am