धरणातील विसर्ग घटला
पावसाने विश्रांती घेतल्याने गंगापूर आणि दारणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू होता. सोमवारी पावसाचा जोर कमी होत मंगळवारी तो अधिकच ओसरला. विशेष म्हणजे तब्बल चार दिवसांनंतर सुर्यदर्शन झाल्याने शहरवासी सुखावले. मंगळवारपासून बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ३७६ मिलीमीटर पाऊस पडला. पेठमध्ये ९८ मिमी, इगतपुरी ८८, सुरगाणा ७१, त्र्यंबकेश्वरला ४९ तर नाशिक तालुक्यात २८.४ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. सिन्नरमध्ये १५.४, दिंडोरीत १२, कळवणमध्ये ६ तर निफाडमध्ये ४.३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधील विसर्गही कमी करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून १५०० क्युसेकने तर दारणा धरणातून ११०० क्युसेकने विसर्ग सुरू होता.