\Bडॉ. राहुल वैद्य यांचे प्रतिपादन \B
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कानातील पडदा फाटण्यामध्ये अनेक कारणे आहेत. मारामारी, मोठा आवाज अशा आघातांनीही पडद्यास नुकसान पोहोचते, असे प्रतिपादन कान, नाक, घसा रोगतज्ज्ञ डॉ. राहुल वैद्य यांनी केले.
प्रौढ नागरिक मित्र मंडळातर्फे मंगळवारी सायंकाळी कान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. वैद्य बोलत होते. प्रौढ नागरिक मित्र मंडळाच्या सभागृहात हे शिबिर पार पडले. कार्यक्रमाला प्रौढ नागरिक मित्र मंडळाचे अध्यक्ष अनंत साळी, डॉ. शरद पाटील, प्रा. टी. बी. साळुंखे, विजया पंडित, शोभना आहेर, सुरेंद्र गुजराथी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. वैद्य म्हणाले, की कानात दुखत असेल तर अनेकजण कानात तेल टाकतात. मात्र, प्रदूषित वातावरण आणि तेल यामुळे कानात बुरशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान बाळाच्या कानातही तेल घालू नये. तसेच कानातील पडद्याला छोटं छिद्र असेल तर ते भरून येतं. मात्र, छिद्र मोठं असेल व त्यातून पाणी येत असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते. डॉ. शरद पाटील यांनी परिचय करून दिला. प्रा. देवी यांनी प्रास्ताविक केले. मधुकर कोठावदे यांनी आभार मानले.