नाशिक : वयाची ६० वर्षे पूर्ण करणाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक असे संबोधून त्यांना सरकारी सवलतींचा फायदा द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक धोरण २०१३ ची अंमलबजावणी करण्याकरिता लागणाऱ्या खर्चाची तरतूद येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये केली जावी, श्रावणबाळ वार्धक्य निवृत्तिवेतनात ६०० रुपयांऐवजी दोन हजार रुपये निवृत्तिवेतन द्यावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य विमा योजना त्वरित लागू करावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयुक्तालय सुरू करावे, ६० वर्षांवरील शेतमजुरांना दरमहा पाच हजार रुपये निवृत्तिवेतन द्यावे, त्याकरिता फेस्कॉम संघटनेच्या प्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवावे आदी मागण्या महासंघाचे अध्यक्ष द. तु. चौधरी, धनंजय चतुर, केदुपंत भालेराव, श्रीराम काकडे आदींनी केल्या.
सरकारी सवलतींचा लाभ देण्याची मागणी
वयाची ६० वर्षे पूर्ण करणाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक असे संबोधून त्यांना सरकारी सवलतींचा फायदा द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र ज्येष्ठ ...
Maharashtra Times 3 Oct 2018, 4:00 am