म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजातील सर्वच नागरिकांची विचारसरणी आधुनिक विज्ञानवादी सशक्त होण्याची गरज आहे. विविध प्रकारच्या अंधश्रद्धा दूर होण्यासाठी सर्व नागरिकांचे जीवनमान सुधारणा होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अॅड. समीर शिंदे यांनी केले.
म्हसरुळ, गुलमोहरनगर येथील ओम गुरुदेव हास्य सरितातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत शनिवारी 'अंधश्रद्धा निर्मूलन : एक चळवळ' या विषयावर ते बोलत होते. माणसाचे पाऊल चंद्रावर गेली कित्येक वर्षांपूर्वी पोहचले आहे. विज्ञानामुळे अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे. मात्र, अजूनही समाजात प्रस्तापित असलेली बुवाबाजी, मांत्रिक आदींची लोकांची विविध प्रकारे शोषण फसवणूक जशी शारीरिक,मानसिक, आर्थिक अशा विविध मार्गाने शोषण करीत राहिलेली आहे. या सर्वांना आळा घालण्यासाठी अनेक वर्षांपासूंनच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीच्या प्रयत्नाने जादुटोणा विरोधी कायदा अंमलात आला आहे. त्याने या सर्व प्रकारच्या गोष्टींना आळा बसण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आजच्या काळाबरोबरच पुरातन काळापासून संत समाजसुधाकांनीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. महाराष्ट्रात संतांच्या विचारसरणीचा वारसा फार महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजातील सर्वच नागरिकांची विचारसरणी आधुनिक विज्ञानवादी सशक्त होण्याची गरज आहे. विविध प्रकारच्या अंधश्रद्धा दूर होण्यासाठी सर्व नागरिकांचे जीवनमान सुधारणा होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अॅड. समीर शिंदे यांनी केले.
म्हसरुळ, गुलमोहरनगर येथील ओम गुरुदेव हास्य सरितातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत शनिवारी 'अंधश्रद्धा निर्मूलन : एक चळवळ' या विषयावर ते बोलत होते. माणसाचे पाऊल चंद्रावर गेली कित्येक वर्षांपूर्वी पोहचले आहे. विज्ञानामुळे अनेक क्षेत्रात प्रगती झाली आहे. मात्र, अजूनही समाजात प्रस्तापित असलेली बुवाबाजी, मांत्रिक आदींची लोकांची विविध प्रकारे शोषण फसवणूक जशी शारीरिक,मानसिक, आर्थिक अशा विविध मार्गाने शोषण करीत राहिलेली आहे. या सर्वांना आळा घालण्यासाठी अनेक वर्षांपासूंनच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीच्या प्रयत्नाने जादुटोणा विरोधी कायदा अंमलात आला आहे. त्याने या सर्व प्रकारच्या गोष्टींना आळा बसण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आजच्या काळाबरोबरच पुरातन काळापासून संत समाजसुधाकांनीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. महाराष्ट्रात संतांच्या विचारसरणीचा वारसा फार महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.