त्र्यंबकेश्वर : शहर आणि परिसरात दोन दिवसांपासून पारा घसरला असून सायंकाळनंतर १० अंशाच्या दरम्यान तापमान उतरल्याने नागरिकांसह भाविक गारठले आहेत. नाताळाच्या सुट्यांच्या निमित्ताने भाविक, पर्यटकांची संख्या वाढली आहे. मंदिराच्या दर्शनबारीत रात्री दहा वाजेनंतर देखील भाविक उभे असतात. थंडीने भाविकांचे हाल होत आहेत. रात्री दहा वाजेनंतर हॉटेल खानावळी बंद होत असल्याने सायंकाळपासून दर्शन बारीत उभे असलेल्या भाविकांची रात्री उशिरा दर्शन घेऊन झाल्यानंतर खाण्यापिण्याची गैरसोय होत आहे.
पारा ६.९ अंशांवर
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गेल्या दोन दिवसांपासून बोचऱ्या थंडीने नाशिककरांना कवटाळले असून शहरासह जिल्हावासीय गारठले आहेत. वाऱ्याचा वेग ताशी नऊ किलोमीटर असल्याने नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून लहान बालके आणि ज्येष्ठ नागरिकांनी गारठ्यामुळे शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. निफाडमध्ये गुरुवारी चालू हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली. १.७ अंश सेल्सियस ऐवढे निचांकी तापमान नोंदविले गेले. तर नाशिकमध्येही पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी हेच तापमान अनुक्रमे चार आणि ६.९ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले आहे. कमाल तपमानही लक्षणीयरित्या घटले आहे. शुक्रवारी २३.९ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तपमानाची नोंद झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत किमान तापमानात वाढ झाली असली तरी थंड हवा मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने शुक्रवारी दिवसभर वातावरणात गारठा जाणवत असल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला.
थंडीपासून बचावासाठी स्वेटर, कानटोपी, मफलर यासारखे उबदार कपडे परिधान करण्यास अबालवृद्धांनी पसंती दिली. वातावरणातील गारठा आरोग्यास हानीकारक ठरण्याची शक्यता अधिक असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडणे कटाक्षाने टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे.
पारा ६.९ अंशांवर
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गेल्या दोन दिवसांपासून बोचऱ्या थंडीने नाशिककरांना कवटाळले असून शहरासह जिल्हावासीय गारठले आहेत. वाऱ्याचा वेग ताशी नऊ किलोमीटर असल्याने नाशिककरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून लहान बालके आणि ज्येष्ठ नागरिकांनी गारठ्यामुळे शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. निफाडमध्ये गुरुवारी चालू हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली. १.७ अंश सेल्सियस ऐवढे निचांकी तापमान नोंदविले गेले. तर नाशिकमध्येही पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी हेच तापमान अनुक्रमे चार आणि ६.९ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले आहे. कमाल तपमानही लक्षणीयरित्या घटले आहे. शुक्रवारी २३.९ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तपमानाची नोंद झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत किमान तापमानात वाढ झाली असली तरी थंड हवा मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने शुक्रवारी दिवसभर वातावरणात गारठा जाणवत असल्याचा अनुभव नाशिककरांनी घेतला.
थंडीपासून बचावासाठी स्वेटर, कानटोपी, मफलर यासारखे उबदार कपडे परिधान करण्यास अबालवृद्धांनी पसंती दिली. वातावरणातील गारठा आरोग्यास हानीकारक ठरण्याची शक्यता अधिक असल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडणे कटाक्षाने टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे.