म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खांदेपालटाचे वारे सुरू झाले असून, नाशिकच्या प्रभारी पदावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांना हटविण्यात आले आहे. या पदाची धुरा आता माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली असून, पाटील नियुक्तीनंतर लगेचच अॅक्टिव्ह झाले आहेत. आज, रविवारी (दि. २४) त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
तीन महिन्यांपूर्वीच नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पक्षातील बदलाचे संकेत मिळाले होते. नाशिकचे प्रभारीपद आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे वर्षभरापासून होते. परंतु, त्यांनी ठाण्यातील व्यापामुळे फारसे लक्ष घातले नाही. त्यामुळे पक्षाला जिल्हा परिषदेसह महापालिकेत फटका सहन करावा लागला. त्यामुळे पक्षाने आता प्रभारीपदाची भाकरी फिरवली असून, शहर व जिल्ह्याचे प्रभारीपद आव्हाड यांच्याकडून काढून घेत थेट जयंत पाटील यांच्याकडे सोपवले आहे. पाटील हे शिस्तप्रिय व स्पष्टवक्ते असल्याने जिल्हा पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद थांबवून शहर व ग्रामीण राष्ट्रवादीला त्यांच्याकडून बळकटी मिळण्याची शक्यता आहे. पाटील यांची नाशिकच्या प्रभारीपदाची नियुक्ती होताच, त्यांनी नाशिकच्या कामकाजाला सुरुवात केली आहे. आज ते नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत दुपारी राष्ट्रवादी भवनात शहर व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली. पाटील यांच्या नियुक्तीने ग्रामीण भागात अपेक्षित असलेला बहुप्रतीक्षित खांदेपालट आता होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते शहर व ग्रामीण राष्ट्रवादीला किती उभारी देतात, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खांदेपालटाचे वारे सुरू झाले असून, नाशिकच्या प्रभारी पदावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांना हटविण्यात आले आहे. या पदाची धुरा आता माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली असून, पाटील नियुक्तीनंतर लगेचच अॅक्टिव्ह झाले आहेत. आज, रविवारी (दि. २४) त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
तीन महिन्यांपूर्वीच नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पक्षातील बदलाचे संकेत मिळाले होते. नाशिकचे प्रभारीपद आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे वर्षभरापासून होते. परंतु, त्यांनी ठाण्यातील व्यापामुळे फारसे लक्ष घातले नाही. त्यामुळे पक्षाला जिल्हा परिषदेसह महापालिकेत फटका सहन करावा लागला. त्यामुळे पक्षाने आता प्रभारीपदाची भाकरी फिरवली असून, शहर व जिल्ह्याचे प्रभारीपद आव्हाड यांच्याकडून काढून घेत थेट जयंत पाटील यांच्याकडे सोपवले आहे. पाटील हे शिस्तप्रिय व स्पष्टवक्ते असल्याने जिल्हा पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद थांबवून शहर व ग्रामीण राष्ट्रवादीला त्यांच्याकडून बळकटी मिळण्याची शक्यता आहे. पाटील यांची नाशिकच्या प्रभारीपदाची नियुक्ती होताच, त्यांनी नाशिकच्या कामकाजाला सुरुवात केली आहे. आज ते नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत दुपारी राष्ट्रवादी भवनात शहर व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली. पाटील यांच्या नियुक्तीने ग्रामीण भागात अपेक्षित असलेला बहुप्रतीक्षित खांदेपालट आता होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते शहर व ग्रामीण राष्ट्रवादीला किती उभारी देतात, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.