म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आगामी विधानसभा निवडणूका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात यासाठी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांकडून ओरड सुरू असली तरी सरकारने मात्र ईव्हीएमद्वारेच निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. ईव्हीएमबाबतचे गैरसमज दूर करतानाच त्याच्या कार्यपिद्धतीबाबत जनजागृतीचे कामही भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार हाती घेण्यात आले आहे. तुम्ही मतदान केले आणि मताबाबत खात्री केली. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा. अफवांमुळे गोंधळून जाऊ नका, असे आवाहन आयोगाने केले आहे.
ईव्हीएम कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाही असा दावा भारत निवडणूक आयोगाने केला असून, ईव्हीएमबाबतच्या जनजागृतीवर भर देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत १० लाखांहून अधिक मतदान केंद्रांमध्ये ६१.३ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यासाठी रँडम पद्धतीने ईव्हीएमचे मतदान केंद्रांना वाटप करण्यात आले. कोणते मशिन कोणत्या केंद्रावर जाणार हे कुणालाही माहीत असण्याचे कारण नाही. प्रत्येक मशिनची तपासणी करतानाच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच ते मोहोरबंद करण्यात आले. अंतिम उमेदवार यादी निश्चित होईपर्यंत कोणत्या उमेदवाराचे नाव कोणत्या क्रमांकावर येणार हे देखील स्पष्ट होत नसल्याने ईव्हीएमच्या मतांमध्ये फेरफार होणार कसा असा सवाल आयोगाने उपस्थित केला आहे. ईव्हीएमची पडताळणी करण्यासाठी राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले. तसेच त्यांनी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठी पाहिली का याबाबत खातरजमा करूनही ईव्हीएमच्या कार्यपद्धतीबाबत शंका घेण्यास ठोस आधार नसल्याचा दावाही या जनजागृतीच्या माध्यमातून केला जाऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरात १७ मतदारांनी व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठीवर चुकीचे मुद्रण झाल्याचा दावा केला होता. परंतु, या शंकांचे निरसन केल्याचा दावाही आयोगाने केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी २० हजार ६८७ व्ही व्ही पॅट मधील चिठ्ठ्या रॅन्डम पध्दतीने मोजण्यात आल्या. त्यापैकी केवळ आठ व्ही व्ही पॅटच्या एकूण मतांमध्ये असमानता आढळून आल्याचा आयोगाचा दावा आहे. तुम्ही मतदान केले आणि तुम्ही दिलेल्या मताबाबत खात्री केली. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा. अफवांमुळे गोंधळून जाऊ नका असे आवाहन आयोगाने केले आहे.
आगामी विधानसभा निवडणूका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात यासाठी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांकडून ओरड सुरू असली तरी सरकारने मात्र ईव्हीएमद्वारेच निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. ईव्हीएमबाबतचे गैरसमज दूर करतानाच त्याच्या कार्यपिद्धतीबाबत जनजागृतीचे कामही भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार हाती घेण्यात आले आहे. तुम्ही मतदान केले आणि मताबाबत खात्री केली. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा. अफवांमुळे गोंधळून जाऊ नका, असे आवाहन आयोगाने केले आहे.
ईव्हीएम कधीही चुकीचे मत नोंदवू शकत नाही असा दावा भारत निवडणूक आयोगाने केला असून, ईव्हीएमबाबतच्या जनजागृतीवर भर देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत १० लाखांहून अधिक मतदान केंद्रांमध्ये ६१.३ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यासाठी रँडम पद्धतीने ईव्हीएमचे मतदान केंद्रांना वाटप करण्यात आले. कोणते मशिन कोणत्या केंद्रावर जाणार हे कुणालाही माहीत असण्याचे कारण नाही. प्रत्येक मशिनची तपासणी करतानाच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच ते मोहोरबंद करण्यात आले. अंतिम उमेदवार यादी निश्चित होईपर्यंत कोणत्या उमेदवाराचे नाव कोणत्या क्रमांकावर येणार हे देखील स्पष्ट होत नसल्याने ईव्हीएमच्या मतांमध्ये फेरफार होणार कसा असा सवाल आयोगाने उपस्थित केला आहे. ईव्हीएमची पडताळणी करण्यासाठी राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले. तसेच त्यांनी व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठी पाहिली का याबाबत खातरजमा करूनही ईव्हीएमच्या कार्यपद्धतीबाबत शंका घेण्यास ठोस आधार नसल्याचा दावाही या जनजागृतीच्या माध्यमातून केला जाऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरात १७ मतदारांनी व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठीवर चुकीचे मुद्रण झाल्याचा दावा केला होता. परंतु, या शंकांचे निरसन केल्याचा दावाही आयोगाने केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी २० हजार ६८७ व्ही व्ही पॅट मधील चिठ्ठ्या रॅन्डम पध्दतीने मोजण्यात आल्या. त्यापैकी केवळ आठ व्ही व्ही पॅटच्या एकूण मतांमध्ये असमानता आढळून आल्याचा आयोगाचा दावा आहे. तुम्ही मतदान केले आणि तुम्ही दिलेल्या मताबाबत खात्री केली. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा. अफवांमुळे गोंधळून जाऊ नका असे आवाहन आयोगाने केले आहे.