म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
वेदांत भेद नको व भक्तीत खोट नको, असे सांगत भगवान शंकरांनी तिसरा डोळा उघडला तर काय होते, याची कथा सांगत श्रृंगेरी शारदापीठाचे जगदगुरू शंकराचार्य प. पू. विधूशेखर भारती यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले.
शंकराचार्य न्यास, धर्मजागरण पीठ, श्री शृंगेरी मठ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था, महर्षी गौतम गोदावरी वेद प्रतिष्ठान या शहरातील विविध संस्थांच्यावतीने श्रृंगेरी शारदापीठाचे जगदगुरू शंकराचार्य प. पू. विधूशेखर भारती स्वामी महाराज यांचा नागरी सत्कार करण्यात आला. गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास संकुलातील कुर्तकोटी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सनातन धर्माच्या उत्थान व प्रसारासाठी होत असलेल्या विजययात्रेसाठी जगदगुरू शंकराचार्य श्री श्री विधूशेखर भारती यांचे नाशिकला आगमन झाले असून, पंचवटीतील शृंगेरी मठात त्यांचे वास्तव्य आहे. दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठ, शृंगेरी चे ३६ वे आचार्य जगदगुरू शंकराचार्य श्री श्री भारतीतीर्थ महास्वामीजी यांच्या कृपाशिर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी विधूशेखर भारती यांनी कर्नाटकमधून विजययात्रेचा प्रारंभ केला आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात आली असून शंकराचार्य संकुल येथे प्रवचनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी गायत्री यांनी स्वागतगीत सादर केले. शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी यांनी शंकराचर्यांचे स्वागत करून त्यांना न्यासाच्या कार्याबाबत माहिती दिली. शांतारामशास्त्री भानोसे यांनी शंकराचार्यांचा परिचय करून दिला. सन्मानपत्र वाचन व सूत्रसंचालन अतुल तरटे यांनी केले.
वेदांत भेद नको व भक्तीत खोट नको, असे सांगत भगवान शंकरांनी तिसरा डोळा उघडला तर काय होते, याची कथा सांगत श्रृंगेरी शारदापीठाचे जगदगुरू शंकराचार्य प. पू. विधूशेखर भारती यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले.
शंकराचार्य न्यास, धर्मजागरण पीठ, श्री शृंगेरी मठ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था, महर्षी गौतम गोदावरी वेद प्रतिष्ठान या शहरातील विविध संस्थांच्यावतीने श्रृंगेरी शारदापीठाचे जगदगुरू शंकराचार्य प. पू. विधूशेखर भारती स्वामी महाराज यांचा नागरी सत्कार करण्यात आला. गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यास संकुलातील कुर्तकोटी सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सनातन धर्माच्या उत्थान व प्रसारासाठी होत असलेल्या विजययात्रेसाठी जगदगुरू शंकराचार्य श्री श्री विधूशेखर भारती यांचे नाशिकला आगमन झाले असून, पंचवटीतील शृंगेरी मठात त्यांचे वास्तव्य आहे. दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठ, शृंगेरी चे ३६ वे आचार्य जगदगुरू शंकराचार्य श्री श्री भारतीतीर्थ महास्वामीजी यांच्या कृपाशिर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी विधूशेखर भारती यांनी कर्नाटकमधून विजययात्रेचा प्रारंभ केला आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात आली असून शंकराचार्य संकुल येथे प्रवचनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी गायत्री यांनी स्वागतगीत सादर केले. शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी यांनी शंकराचर्यांचे स्वागत करून त्यांना न्यासाच्या कार्याबाबत माहिती दिली. शांतारामशास्त्री भानोसे यांनी शंकराचार्यांचा परिचय करून दिला. सन्मानपत्र वाचन व सूत्रसंचालन अतुल तरटे यांनी केले.