डॉ. दीपक पवार यांचे आवाहन
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आपले भविष्य घडवण्यासाठी शिक्षणाचा मजबूत पाया सहाय्यक ठरत असतो. मात्र अनेक विद्यार्थ्यांबद्दल वेगवेगळ्या कारणांनी शिक्षण थांबल्याची उदाहरणे समोर येत असतात. मुलींबाबत अशा घटना दुर्दैवीपणे जास्त घडत असतात. परंतु, कोणत्याही परिस्थितीत आपले शिक्षण थांबू देऊ नका.
करिअरसाठी बंडखोरी करावी लागली तरी चालेल पण शिक्षण पूर्ण करण्यावर भर द्या, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख तथा राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांनी केले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि. २३) मानव अधिकार संवर्धन संघटनच्या वतीने एकलव्य गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. शहरातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी नसताना, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रथम प्रयत्नात दहावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या १५० विद्यार्थ्यांना या सोहळ्यात गौरवण्यात आले.
या संस्थेने शहरातील ४४ शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करुन हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांची निवड केली होती. या गौरव सोहळ्याबरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक श्यामला चव्हाण यांनी केले. तर शांताराम चव्हाण यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. मिलिंद वाघ, शेखर साळवी, उन्मेष बागवे उपस्थित होते.
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आपले भविष्य घडवण्यासाठी शिक्षणाचा मजबूत पाया सहाय्यक ठरत असतो. मात्र अनेक विद्यार्थ्यांबद्दल वेगवेगळ्या कारणांनी शिक्षण थांबल्याची उदाहरणे समोर येत असतात. मुलींबाबत अशा घटना दुर्दैवीपणे जास्त घडत असतात. परंतु, कोणत्याही परिस्थितीत आपले शिक्षण थांबू देऊ नका.
करिअरसाठी बंडखोरी करावी लागली तरी चालेल पण शिक्षण पूर्ण करण्यावर भर द्या, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख तथा राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांनी केले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवारी (दि. २३) मानव अधिकार संवर्धन संघटनच्या वतीने एकलव्य गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. शहरातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी नसताना, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रथम प्रयत्नात दहावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या १५० विद्यार्थ्यांना या सोहळ्यात गौरवण्यात आले.
या संस्थेने शहरातील ४४ शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करुन हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांची निवड केली होती. या गौरव सोहळ्याबरोबरच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक श्यामला चव्हाण यांनी केले. तर शांताराम चव्हाण यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. मिलिंद वाघ, शेखर साळवी, उन्मेष बागवे उपस्थित होते.