म. टा. प्रतिनिधी, नाशिक
दामदुप्पट करून देतो, अशी बतावणी करून एका व्यावसायिकाला तब्बल २० लाख रुपयांना गंडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, पैसे परत मागणाऱ्या व्यावसायिकाला संशयितांनी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी, शहरातील एका व ठाणे जिल्ह्यातील तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अंबड पोलिस पुढील तपास करीत आहे.
फसवणुकीच्या घटनेबाबत हनुमंत उत्तरेश्वर धावणे (४५) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी भिवंडी येथील राजू कृष्णा भोईर उर्फ राजू पाटील, विजयकुमार सिंग, धनसिंग चित्तसिंग शिरपाली व आणखी एका नाव माहित नसलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कामटवाडे परिसरातील आयटीआयरोडवरील कोमल टॉवर येथे राहणारे धावणे ट्रान्सपोर्ट व्यवसाय करतात. राहत्या घराजवळच त्यांचे कार्यालय आहे. संशयित आरोपी धनसिंग चित्तसिंग शिरपाली हा काठेगल्ली परिसरातील मनिक्षानगर येथील रवींद्र विद्यालयाजवळ राहातो. ट्रान्सपोर्टच्या व्यवसायातूनच शिरपाली आणि धावणे यांची ओळख झाली होती. साधारणतः तीन महिन्यापूर्वी शिरपाली धावणेंच्या कार्यालयात आला होता. तेव्हा त्याच्यासोबत त्याचे चार मित्रही होते. त्यावेळी संशयित आरोपींनी धावणेंना एका तासात दामदुप्पट पैसे करून देणार असल्याचे सांगितले. मात्र, पैसे नसल्याचे धावणेंनी स्पष्ट केल्यानंतर संशयित निघून गेले.
फ्लॅट विक्रीच्या माध्यमातून धावणेंकडे २० लाख रुपये आले. याची माहिती त्यांनी संशयितांना दिली. त्यानुसार सर्व आरोपींनी नाशिकला येत असल्याचे सांगितले. बँकेतून एक हजार रूपयांच्या नोटा काढाव्यात अशी सूचना त्यांनी केली. त्यानुसार २१ जून रोजी सर्वजण जमले. मात्र, संशयितांनी दुप्पट रक्कमेसाठी एकांत जागा हवी, असे सांगितले. त्यानुसार, धावणे यांनी अंबड लिंकरोडवरील त्यांच्या बहिणीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. चालक वगळता इतर आरोपी घरात आले. एका भांड्यात रक्कम टाकून त्यावर पाणी व काहीतरी केमिकल टाकले. त्यानंतर सर्व रक्कम पेपरमध्ये गुंडाळून तीन बंडल तयार केले. यावेळी संशयितांनी कापूर आणण्यासाठी धावणेंना बाहेर पाठवले. ते परत आल्यानंतर भांड्यात ठेवलेली रक्कम उद्या सकाळपर्यंत दुप्पट होईल. आम्ही परत येईपर्यंत झाकण काढायचे नाही, असे सांगत संशयितांनी इनोव्हा कार क्रमांक एमएच ०४ ईडी ९९८९ मधून धूम ठोकली. दुसऱ्या दिवशी सकाळी धावणेंनी अनेकदा फोन करूनही संशयित प्रतिसाद देत नव्हते. म्हणून त्यांनी स्वतः भांड्यावरील झाकण दूर केले असता त्यात फक्त कागदच आढळून आले.
दामदुप्पट करून देतो, अशी बतावणी करून एका व्यावसायिकाला तब्बल २० लाख रुपयांना गंडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, पैसे परत मागणाऱ्या व्यावसायिकाला संशयितांनी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी, शहरातील एका व ठाणे जिल्ह्यातील तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अंबड पोलिस पुढील तपास करीत आहे.
फसवणुकीच्या घटनेबाबत हनुमंत उत्तरेश्वर धावणे (४५) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी भिवंडी येथील राजू कृष्णा भोईर उर्फ राजू पाटील, विजयकुमार सिंग, धनसिंग चित्तसिंग शिरपाली व आणखी एका नाव माहित नसलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कामटवाडे परिसरातील आयटीआयरोडवरील कोमल टॉवर येथे राहणारे धावणे ट्रान्सपोर्ट व्यवसाय करतात. राहत्या घराजवळच त्यांचे कार्यालय आहे. संशयित आरोपी धनसिंग चित्तसिंग शिरपाली हा काठेगल्ली परिसरातील मनिक्षानगर येथील रवींद्र विद्यालयाजवळ राहातो. ट्रान्सपोर्टच्या व्यवसायातूनच शिरपाली आणि धावणे यांची ओळख झाली होती. साधारणतः तीन महिन्यापूर्वी शिरपाली धावणेंच्या कार्यालयात आला होता. तेव्हा त्याच्यासोबत त्याचे चार मित्रही होते. त्यावेळी संशयित आरोपींनी धावणेंना एका तासात दामदुप्पट पैसे करून देणार असल्याचे सांगितले. मात्र, पैसे नसल्याचे धावणेंनी स्पष्ट केल्यानंतर संशयित निघून गेले.
फ्लॅट विक्रीच्या माध्यमातून धावणेंकडे २० लाख रुपये आले. याची माहिती त्यांनी संशयितांना दिली. त्यानुसार सर्व आरोपींनी नाशिकला येत असल्याचे सांगितले. बँकेतून एक हजार रूपयांच्या नोटा काढाव्यात अशी सूचना त्यांनी केली. त्यानुसार २१ जून रोजी सर्वजण जमले. मात्र, संशयितांनी दुप्पट रक्कमेसाठी एकांत जागा हवी, असे सांगितले. त्यानुसार, धावणे यांनी अंबड लिंकरोडवरील त्यांच्या बहिणीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. चालक वगळता इतर आरोपी घरात आले. एका भांड्यात रक्कम टाकून त्यावर पाणी व काहीतरी केमिकल टाकले. त्यानंतर सर्व रक्कम पेपरमध्ये गुंडाळून तीन बंडल तयार केले. यावेळी संशयितांनी कापूर आणण्यासाठी धावणेंना बाहेर पाठवले. ते परत आल्यानंतर भांड्यात ठेवलेली रक्कम उद्या सकाळपर्यंत दुप्पट होईल. आम्ही परत येईपर्यंत झाकण काढायचे नाही, असे सांगत संशयितांनी इनोव्हा कार क्रमांक एमएच ०४ ईडी ९९८९ मधून धूम ठोकली. दुसऱ्या दिवशी सकाळी धावणेंनी अनेकदा फोन करूनही संशयित प्रतिसाद देत नव्हते. म्हणून त्यांनी स्वतः भांड्यावरील झाकण दूर केले असता त्यात फक्त कागदच आढळून आले.