म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
गोदावरी प्रदूषणुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत असल्याचे देखावा वारंवार करीत आली आहे. मात्र, पावसाळ्यात गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली, की गोदावरी प्रदूषणाच्या विषयाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असते. असेच चित्र सध्या दिसत असून, पूर ओसरल्यानंतर पुन्हा गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात असल्याची स्थिती आहे. पंचवटी अमरधामजवळ, तसेच अन्य ठिकाणीदेखील नाले, गटारींचे सांडपाणी थेट गोदापात्रात मिसळत असल्याचे दिसून येत आहे.
जोराचा पाऊस सुरू होताच यंदाही पावसाळी गटार योजनेचे पितळ उघडे पडले. ड्रेनेज लाइनमध्ये हे पाणी जात असल्याने सर्व गटारींचे पाणी गोदापात्रात येत असल्याचे पूर परिस्थितीच्या वेळी बघायला मिळाले. पाऊस थांबल्यानंतर गोदावरीच्या पाण्याची पातळी कमी होत गेली आणि पुन्हा गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात अडकू लागली आहे.
पंचवटीत परिसरातील इंद्रकुंड, मालवीय चौक, शनी चौक, सरदार चौक, काळाराम मंदिर परिसर येथून येणारी ड्रेनेज लाइन रामसेतूच्या समोरच्या भागात उघडी झालेली दिसते. या भागात सिमेंटच्या पोलचे ढापे या लाइनवर टाकण्यात आले आहेत. हे पाणी वाघाडी नाल्याच्या पाण्यात मिसळले जाते. दोन्हीकडून येणाऱ्या या घाण पाण्याचा प्रवाह पुढे नवीन सिंहस्थ शाहीमार्गाजवळून पुढे नेण्यात आला आहे. पंचवटी अमरधाम येथे या नाल्यातील पाणी थेट गोदापात्रात जात आहे.
शहरात गंगापूरपासून ठिकठिकाणी असे नाले, गटारी थेट गोदापात्रात सोडून दिल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात गोदाप्रेमींकडून वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्यामनंतरदेखील उपाययोजना केल्या जात नसल्याची स्थिती असून, हे चित्र नेमके बदलणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
--
संवर्धन कक्ष नावापुरताच
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एकीकडे गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना करायची आणि दुसरीकडे गटारीचे पाणी थेट नदीपात्रात सोडायचे, अशी स्थिती दिसत आहे. जणूकाही पुरामुळे गोदावरीच्या पात्रातील सर्व घाण वाहून गेली आहे, आता गोदावरीकडे बघण्याची गरज नाही, असे महापालिका प्रशासनाला वाटत असावे. म्हणून ते गोदावरीच्या प्रदूषणाकडे गांभीर्याने बघत नाहीत, असा आरोप गोदाप्रेमींकडून केला जात आहे.
--
गोदावरीच्या पात्रात गटारीचे घाण पाणी मिसळत असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही या परिस्थितीत सुधारणा झाली नाही. तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गोदावरीचे प्रदूषण काही थांबत नसल्याची स्थिती आहे.
-निशिकांत पगारे, पर्यावरणप्रेमी
गोदावरी प्रदूषणुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत असल्याचे देखावा वारंवार करीत आली आहे. मात्र, पावसाळ्यात गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली, की गोदावरी प्रदूषणाच्या विषयाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असते. असेच चित्र सध्या दिसत असून, पूर ओसरल्यानंतर पुन्हा गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात असल्याची स्थिती आहे. पंचवटी अमरधामजवळ, तसेच अन्य ठिकाणीदेखील नाले, गटारींचे सांडपाणी थेट गोदापात्रात मिसळत असल्याचे दिसून येत आहे.
जोराचा पाऊस सुरू होताच यंदाही पावसाळी गटार योजनेचे पितळ उघडे पडले. ड्रेनेज लाइनमध्ये हे पाणी जात असल्याने सर्व गटारींचे पाणी गोदापात्रात येत असल्याचे पूर परिस्थितीच्या वेळी बघायला मिळाले. पाऊस थांबल्यानंतर गोदावरीच्या पाण्याची पातळी कमी होत गेली आणि पुन्हा गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात अडकू लागली आहे.
पंचवटीत परिसरातील इंद्रकुंड, मालवीय चौक, शनी चौक, सरदार चौक, काळाराम मंदिर परिसर येथून येणारी ड्रेनेज लाइन रामसेतूच्या समोरच्या भागात उघडी झालेली दिसते. या भागात सिमेंटच्या पोलचे ढापे या लाइनवर टाकण्यात आले आहेत. हे पाणी वाघाडी नाल्याच्या पाण्यात मिसळले जाते. दोन्हीकडून येणाऱ्या या घाण पाण्याचा प्रवाह पुढे नवीन सिंहस्थ शाहीमार्गाजवळून पुढे नेण्यात आला आहे. पंचवटी अमरधाम येथे या नाल्यातील पाणी थेट गोदापात्रात जात आहे.
शहरात गंगापूरपासून ठिकठिकाणी असे नाले, गटारी थेट गोदापात्रात सोडून दिल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात गोदाप्रेमींकडून वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्यामनंतरदेखील उपाययोजना केल्या जात नसल्याची स्थिती असून, हे चित्र नेमके बदलणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
--
संवर्धन कक्ष नावापुरताच
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एकीकडे गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना करायची आणि दुसरीकडे गटारीचे पाणी थेट नदीपात्रात सोडायचे, अशी स्थिती दिसत आहे. जणूकाही पुरामुळे गोदावरीच्या पात्रातील सर्व घाण वाहून गेली आहे, आता गोदावरीकडे बघण्याची गरज नाही, असे महापालिका प्रशासनाला वाटत असावे. म्हणून ते गोदावरीच्या प्रदूषणाकडे गांभीर्याने बघत नाहीत, असा आरोप गोदाप्रेमींकडून केला जात आहे.
--
गोदावरीच्या पात्रात गटारीचे घाण पाणी मिसळत असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगूनही या परिस्थितीत सुधारणा झाली नाही. तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गोदावरीचे प्रदूषण काही थांबत नसल्याची स्थिती आहे.
-निशिकांत पगारे, पर्यावरणप्रेमी