प्रयोगशाळांबाबत नागरिक अनभिज्ञ
म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सुरू केलेल्या असल्या तरी गेल्या वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील अवघ्या २५ नागरिकांनी आपल्याकडील पाण्याचे नमुने तपासणी करून घेतले आहे. यावरून जिल्ह्यातील नागरिक या प्रयोगशाळांबाबत अनभिज्ञ असल्याची बाब उघड झाली आहे.
राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अखत्यारीत पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात नाशिक विभागीय स्तरावरील पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेसह जिल्हा स्तरावरील एक व उपविभागीय स्तरावरील सहा अशा सात पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र या प्रयोगशाळांबाबत जिल्ह्यातील नागरिक अनभिज्ञ असल्याचे चित्र सध्या दिसून आले आहे.
नायट्रेटचे वाढते प्रमाण
जिल्ह्यातील शेती व्यवसायासाठी रासायनिक खतांचा वापर काही वर्षांत भरमसाठ वाढला असल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील पाण्याच्या स्रोतात नायट्रेटचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, अशा स्रोतांतील पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने त्याचा दुष्परिणाम नागरिकांसह शेतकऱ्यांकडील पशुधनाच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. उघड्यावरील गटारी व शेतात पिकांवर फवारणाऱ्या रासायनिक औषधांमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्याचे तपासणीत समजले आहे.
म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सुरू केलेल्या असल्या तरी गेल्या वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील अवघ्या २५ नागरिकांनी आपल्याकडील पाण्याचे नमुने तपासणी करून घेतले आहे. यावरून जिल्ह्यातील नागरिक या प्रयोगशाळांबाबत अनभिज्ञ असल्याची बाब उघड झाली आहे.
राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अखत्यारीत पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात नाशिक विभागीय स्तरावरील पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेसह जिल्हा स्तरावरील एक व उपविभागीय स्तरावरील सहा अशा सात पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र या प्रयोगशाळांबाबत जिल्ह्यातील नागरिक अनभिज्ञ असल्याचे चित्र सध्या दिसून आले आहे.
नायट्रेटचे वाढते प्रमाण
जिल्ह्यातील शेती व्यवसायासाठी रासायनिक खतांचा वापर काही वर्षांत भरमसाठ वाढला असल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील पाण्याच्या स्रोतात नायट्रेटचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, अशा स्रोतांतील पाण्याचा वापर पिण्यासाठी होत असल्याने त्याचा दुष्परिणाम नागरिकांसह शेतकऱ्यांकडील पशुधनाच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. उघड्यावरील गटारी व शेतात पिकांवर फवारणाऱ्या रासायनिक औषधांमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित झाल्याचे तपासणीत समजले आहे.