नाशिक : नाशिक-पेठ रस्त्याचे पाच किलोमीटर अंतराचे काम वन विभाग खात्याने परवानगी न दिल्याने रखडले आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण झालेला नाही. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू होते. ते रखडत पूर्ण झाले असले तरी पाच किलोमीटरच. रस्त्याचे काम अपूर्णच आहे. सुमारे १५७ कोटी रुपये खर्च करून हा ३९ किलोमीटरचा पार्डी गावापर्यंत रस्ता करण्यात आला. मात्र, संपूर्ण काँक्रिटीकरणाचे काम असलेल्या या रस्त्यामुळे नाशिक ते अहमदाबाद हे अंतर कमी वेळात वाहनचालकांना पार करता येणार आहे. आदिवासी भागातून जाणारा हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून खराब होता. त्यामुळे त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाची मागणी होती. त्यासाठी निधीही मंजूर झाला. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. पण, वन विभागाचा अडथळा आल्यामुळे त्याचे काम पूर्ण झाललेे नाही.
वन विभागामुळे पेठ रस्ता अपूर्णच
नाशिक-पेठ रस्त्याचे पाच किलोमीटर अंतराचे काम वन विभाग खात्याने परवानगी न दिल्याने रखडले आहे त्यामुळे हा रस्ता पूर्ण झालेला नाही...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2020, 4:00 am