एमआयडीसीत पाण्याची नासाडी; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
म. टा. वृत्तसेवा, सातपूर
अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनीला गळती लागली आहे. यामुळे रोजच शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याने एमआयडीसीतील पाण्याची नासाडी होत आहे. त्याचा फटका येथील रस्त्यांना बसत असून, रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे
एमआयडीसीतील पिण्याच्या पाइपलाइनीतून पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने येथील विविध ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या समस्येबाबत एमआयडीसीचे अधिकारी कधी लक्ष देणार असा सवाल उद्योजक व कामगारांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, एमआयडीसीने नव्याने निर्माण केलेला आयटी पार्कच्या रस्त्यांवरूनच पाणी वाहत असल्याने एमआयडीसी दुरूस्तीचे काम कधी हाती घेणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
उद्योजकांनी अनेकदा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची समस्या एमआयडीसीकडे मांडली होती. यानंतर आनंदवली गावातील पंपिग स्टेशन बंद करत एमआयडीसीने गंगापूर धरणातून थेट पाइपलाइन टाकत कारखान्यांसाठी मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला होता. मुबलक पाणीपुरवठा कारखान्यांना मिळत असतानाही ही पाणी गळतीची मोठी समस्या या भागात भेडसावत आहे.
पाणीगळती रोखणार कोण?
पाण्याच्या पाइपलाइनीला लागलेल्या पाणी गळतीबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असतानादेखील पाणीगळती रोखणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाणी गळतीने अंबड एमआयडीसीतील आयटी पार्कचे रस्तेही नादुरूस्त झाले आहेत. रोजच हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक झाले आहे.
पिण्याचे पाणी अनमोल असताना अंबड एमआयडीसीत हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे एमआयडीसीतील अधिकारी पाणीगळती कधी रोखणार, असा प्रश्न पडतो. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष देण्याची गरज आहे.
-राकेश पवार, कामगार
म. टा. वृत्तसेवा, सातपूर
अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनीला गळती लागली आहे. यामुळे रोजच शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याने एमआयडीसीतील पाण्याची नासाडी होत आहे. त्याचा फटका येथील रस्त्यांना बसत असून, रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे
एमआयडीसीतील पिण्याच्या पाइपलाइनीतून पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने येथील विविध ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या समस्येबाबत एमआयडीसीचे अधिकारी कधी लक्ष देणार असा सवाल उद्योजक व कामगारांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, एमआयडीसीने नव्याने निर्माण केलेला आयटी पार्कच्या रस्त्यांवरूनच पाणी वाहत असल्याने एमआयडीसी दुरूस्तीचे काम कधी हाती घेणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
उद्योजकांनी अनेकदा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची समस्या एमआयडीसीकडे मांडली होती. यानंतर आनंदवली गावातील पंपिग स्टेशन बंद करत एमआयडीसीने गंगापूर धरणातून थेट पाइपलाइन टाकत कारखान्यांसाठी मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला होता. मुबलक पाणीपुरवठा कारखान्यांना मिळत असतानाही ही पाणी गळतीची मोठी समस्या या भागात भेडसावत आहे.
पाणीगळती रोखणार कोण?
पाण्याच्या पाइपलाइनीला लागलेल्या पाणी गळतीबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असतानादेखील पाणीगळती रोखणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाणी गळतीने अंबड एमआयडीसीतील आयटी पार्कचे रस्तेही नादुरूस्त झाले आहेत. रोजच हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक झाले आहे.
पिण्याचे पाणी अनमोल असताना अंबड एमआयडीसीत हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे एमआयडीसीतील अधिकारी पाणीगळती कधी रोखणार, असा प्रश्न पडतो. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष देण्याची गरज आहे.
-राकेश पवार, कामगार