म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
द्वारका चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण काढून तेथे यू-टर्नद्वारे वाहतूक वळवण्याच्या विषयावर शुक्रवारी पालिका आयुक्त, आमदार देवयानी फरांदे व अतिक्रमण धारकांची बैठक झाली. या बैठकीत गाळेधारकांनी अतिक्रमण काढून घेतल्यास त्यांच्या पुनर्वसनाचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास कोर्टाच्या निकालानंतर कारवाई केली जाईल, असे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘द्वारका’ची कोंडी फुटण्यासाठी कोर्टाच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.
या बैठकीत ‘द्वारका’ची कोंडी फोडण्यासाठी महापालिकेची जागा रिक्त करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. येथील हनुमान मंदिराचे स्थलांतर करणे, भुयारी मार्ग वाढवणे आणि पुण्याकडून येणारी वाहने यू-टर्नने मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव आमदारांनी ठेवला. त्यावर येथील व्यावसायिकांनी अतिक्रमण काढल्यास हे काम तातडीने सुरू करता येईल, असे आयुक्तांनी सांगितले. परंतु, गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. तो मागे घ्यावा, असे सांगण्यात आले. परंतु, गाळेधारक तयार नसल्याने आयुक्तांनीही न्यायालयाच्या निकालानंतर बघू, असे सांगितले.
‘न्हाई’ची ना-हरकत हवी
द्वारकाची कोंडी फोडण्यासाठी पुणे व धुळ्याकडून येणारी वाहतूक यू-टर्नने वळविण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत महापालिका आयुक्तांनी या कामाची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (न्हाई) ना-हरकत दाखला मागितला आहे. मुंबईकडून येणारी वाहतूक टाकळीरोडने वळवायची आणि पुण्याकडील वाहतूक मुंबई नाक्याकडे वळवण्याचा विचार सुरू आहे. परंतु, त्यासाठी बॅरिकेट्स तोडावे लागणार आहेत. त्यासाठी परवानगी मिळाल्यास पालिका द्वारकाची कोंडी फोडण्यासाठी चाचपणी करणार आहे.
द्वारका चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण काढून तेथे यू-टर्नद्वारे वाहतूक वळवण्याच्या विषयावर शुक्रवारी पालिका आयुक्त, आमदार देवयानी फरांदे व अतिक्रमण धारकांची बैठक झाली. या बैठकीत गाळेधारकांनी अतिक्रमण काढून घेतल्यास त्यांच्या पुनर्वसनाचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास कोर्टाच्या निकालानंतर कारवाई केली जाईल, असे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘द्वारका’ची कोंडी फुटण्यासाठी कोर्टाच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.
या बैठकीत ‘द्वारका’ची कोंडी फोडण्यासाठी महापालिकेची जागा रिक्त करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. येथील हनुमान मंदिराचे स्थलांतर करणे, भुयारी मार्ग वाढवणे आणि पुण्याकडून येणारी वाहने यू-टर्नने मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव आमदारांनी ठेवला. त्यावर येथील व्यावसायिकांनी अतिक्रमण काढल्यास हे काम तातडीने सुरू करता येईल, असे आयुक्तांनी सांगितले. परंतु, गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. तो मागे घ्यावा, असे सांगण्यात आले. परंतु, गाळेधारक तयार नसल्याने आयुक्तांनीही न्यायालयाच्या निकालानंतर बघू, असे सांगितले.
‘न्हाई’ची ना-हरकत हवी
द्वारकाची कोंडी फोडण्यासाठी पुणे व धुळ्याकडून येणारी वाहतूक यू-टर्नने वळविण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत महापालिका आयुक्तांनी या कामाची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (न्हाई) ना-हरकत दाखला मागितला आहे. मुंबईकडून येणारी वाहतूक टाकळीरोडने वळवायची आणि पुण्याकडील वाहतूक मुंबई नाक्याकडे वळवण्याचा विचार सुरू आहे. परंतु, त्यासाठी बॅरिकेट्स तोडावे लागणार आहेत. त्यासाठी परवानगी मिळाल्यास पालिका द्वारकाची कोंडी फोडण्यासाठी चाचपणी करणार आहे.