म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा
ओव्हर फ्रिक्वेन्सीमुळे गेल्या सोमवारी एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील ३४० मेगा वॅट क्षमतेचे तीनपैकी दोन वीज निर्मिती संच बंद पडल्याने महानिर्मितीचे जवळपास दीड कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती या वीज निर्मिती केंद्राचे कार्यकारी अभियंता प्रकाश खंडारे यांनी दिली आहे. पारेषणच्या फिडरमध्येच बिघाड झाल्याने ओव्हर फ्रिक्वेन्सीचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु त्यामागील कारण अद्याप पारेषण कंपनीकडून मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमवारी रात्री दीडच्या सुमरास ग्रीड व्होल्टेज कमी होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर ओव्हर फ्रिक्वेन्सी झाल्याने पहाटे ४.५८ वा. एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील तीनपैकी दोन वीज निर्मिती संच बंद पडले होते. त्यानंतर ओव्हर फ्रिक्वेन्सी व्हेरिफिकेशन करण्यास सहातासांचा कालावधी लागला होता. यावेळेत दोन संचाची वीज निर्मिती ठप्प पडल्याने महानिर्मितीचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीस पारेषण कंपनीच जबाबदार असल्याचे महानिर्मिती कंपनीचे म्हणणे आहे. पारेषण कंपनीकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
ओव्हर फ्रिक्वेन्सीमुळे गेल्या सोमवारी एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील ३४० मेगा वॅट क्षमतेचे तीनपैकी दोन वीज निर्मिती संच बंद पडल्याने महानिर्मितीचे जवळपास दीड कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती या वीज निर्मिती केंद्राचे कार्यकारी अभियंता प्रकाश खंडारे यांनी दिली आहे. पारेषणच्या फिडरमध्येच बिघाड झाल्याने ओव्हर फ्रिक्वेन्सीचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु त्यामागील कारण अद्याप पारेषण कंपनीकडून मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमवारी रात्री दीडच्या सुमरास ग्रीड व्होल्टेज कमी होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर ओव्हर फ्रिक्वेन्सी झाल्याने पहाटे ४.५८ वा. एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील तीनपैकी दोन वीज निर्मिती संच बंद पडले होते. त्यानंतर ओव्हर फ्रिक्वेन्सी व्हेरिफिकेशन करण्यास सहातासांचा कालावधी लागला होता. यावेळेत दोन संचाची वीज निर्मिती ठप्प पडल्याने महानिर्मितीचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीस पारेषण कंपनीच जबाबदार असल्याचे महानिर्मिती कंपनीचे म्हणणे आहे. पारेषण कंपनीकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.