म. टा. वृत्तसेवा, सातपूर
औद्योगिक विकास महामंडळाने आरक्षित ठेवलेल्या सातपूर व अंबड परिसरातील सेवा-सुविधा क्षेत्राच्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे फोफावली आहेत. एमआयडीसीने दुर्लक्ष केल्यानेच ही अतिक्रमणे वाढली असल्याचा आरोप उद्योजकांकडून केला जात आहे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन योग्य त्या वापरासाठी संबंधित भूखंड खुले करावेत, अशी मागणीही करण्यात येत आहे.
अगोदरच सातपूर व अंबड एमआयडीसीत भूखंड मिळविण्यासाठी उद्योजकांमध्ये चढाओढ सुरू असताना एमआयडीसीच्या मालकीच्या भूखंडांवर अतिक्रमणे होत असल्याची स्थिती आहे. मात्र, त्याकडे संबंधित यंत्रणेचा कानाडोळा होत असल्याने आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणीही उद्योजकांनी केली आहे.
एमआयडीसीने अंबड गावाला लागून सेवा-सुविधा क्षेत्रासाठी भूखंड क्रमांक ४१ आरक्षित ठेवला आहे. अनेक वर्षांपासून संबंधित आरक्षित भूखंड सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी दिलेला होता. परंतु, अंबड गावाला लागून असल्याने त्या ठिकाणी सांडपाणी प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर मात्र गेल्या काही वर्षांत आरक्षित असलेल्या या व अशाच अन्य भूखंडांवर अतिक्रमण वाढले आहे.
स्पर्धा अन् दुर्लक्ष!
एकीकडे सातपूर व अंबड एमआयडीसीत भूखंड मिळावा यासाठी उद्योजकांमध्ये मोठी स्पर्धा लागलेली दिसते. परंतु, भूखंडच शिल्लक नसल्याचे कारण एमआयडीसीकडून सांगण्यात येते. अशातच एमआयडीसीच्या आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण होत असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एमआयडीसीने रस्त्यात येणाऱ्या देवस्थानांवर कारवाई करीत ती काढली. परंतु, स्वतःच्या जागेवरच अनेकांची अतिक्रमणे होत असताना याप्रश्नी कारवाई करण्याची गरज प्रतिपादित केली जात आहे.
शौचालयांचीही उभारणी
महापालिकेने एमआयडीसीची कुठलीही परवानगी न घेता सार्वजनिक शौचालयाची उभारणीही एमआयडीसीच्या भूखंडांवर केली आहे. त्यातच पडून असलेल्या भूखंडांकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष झाल्याने झोपड्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. एकामागून एक पत्र्यांच्या शेडचे अतिक्रमण एमआयडीसीच्या भूखंडांवर वाढत चालल्याने बकाल स्वरूप आल्याचे चित्र आहे. याकडे एमआयडीसीने वेळवर लक्ष न दिल्यास कोट्यवधी रुपयांचे भूखंड मातीमोल भावात दिले जातील की काय, अशी भीतीही व्यक्त होत आहे. एमआयडीसीच्या स्वतःच्या मालकीच्या भूखंडांवर वाढत चाललेले अतिक्रमण रोखण्याची गरज असल्याची भावना उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.
--
सातपूर व अंबड भागात सेवा-सुविधा क्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या अनेक भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. परंतु, एमआयडीसीकडून कुठलीच कारवाई केली जात नसल्याने या भूखंडांना बकाल स्वरूप आले आहे. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याप्रश्नी लक्ष देण्याची गरज आहे.
-राजेंद्र देशमुख, उद्योजक
औद्योगिक विकास महामंडळाने आरक्षित ठेवलेल्या सातपूर व अंबड परिसरातील सेवा-सुविधा क्षेत्राच्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे फोफावली आहेत. एमआयडीसीने दुर्लक्ष केल्यानेच ही अतिक्रमणे वाढली असल्याचा आरोप उद्योजकांकडून केला जात आहे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन योग्य त्या वापरासाठी संबंधित भूखंड खुले करावेत, अशी मागणीही करण्यात येत आहे.
अगोदरच सातपूर व अंबड एमआयडीसीत भूखंड मिळविण्यासाठी उद्योजकांमध्ये चढाओढ सुरू असताना एमआयडीसीच्या मालकीच्या भूखंडांवर अतिक्रमणे होत असल्याची स्थिती आहे. मात्र, त्याकडे संबंधित यंत्रणेचा कानाडोळा होत असल्याने आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणीही उद्योजकांनी केली आहे.
एमआयडीसीने अंबड गावाला लागून सेवा-सुविधा क्षेत्रासाठी भूखंड क्रमांक ४१ आरक्षित ठेवला आहे. अनेक वर्षांपासून संबंधित आरक्षित भूखंड सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी दिलेला होता. परंतु, अंबड गावाला लागून असल्याने त्या ठिकाणी सांडपाणी प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता. त्यानंतर मात्र गेल्या काही वर्षांत आरक्षित असलेल्या या व अशाच अन्य भूखंडांवर अतिक्रमण वाढले आहे.
स्पर्धा अन् दुर्लक्ष!
एकीकडे सातपूर व अंबड एमआयडीसीत भूखंड मिळावा यासाठी उद्योजकांमध्ये मोठी स्पर्धा लागलेली दिसते. परंतु, भूखंडच शिल्लक नसल्याचे कारण एमआयडीसीकडून सांगण्यात येते. अशातच एमआयडीसीच्या आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण होत असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एमआयडीसीने रस्त्यात येणाऱ्या देवस्थानांवर कारवाई करीत ती काढली. परंतु, स्वतःच्या जागेवरच अनेकांची अतिक्रमणे होत असताना याप्रश्नी कारवाई करण्याची गरज प्रतिपादित केली जात आहे.
शौचालयांचीही उभारणी
महापालिकेने एमआयडीसीची कुठलीही परवानगी न घेता सार्वजनिक शौचालयाची उभारणीही एमआयडीसीच्या भूखंडांवर केली आहे. त्यातच पडून असलेल्या भूखंडांकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष झाल्याने झोपड्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. एकामागून एक पत्र्यांच्या शेडचे अतिक्रमण एमआयडीसीच्या भूखंडांवर वाढत चालल्याने बकाल स्वरूप आल्याचे चित्र आहे. याकडे एमआयडीसीने वेळवर लक्ष न दिल्यास कोट्यवधी रुपयांचे भूखंड मातीमोल भावात दिले जातील की काय, अशी भीतीही व्यक्त होत आहे. एमआयडीसीच्या स्वतःच्या मालकीच्या भूखंडांवर वाढत चाललेले अतिक्रमण रोखण्याची गरज असल्याची भावना उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.
--
सातपूर व अंबड भागात सेवा-सुविधा क्षेत्रासाठी आरक्षित असलेल्या अनेक भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. परंतु, एमआयडीसीकडून कुठलीच कारवाई केली जात नसल्याने या भूखंडांना बकाल स्वरूप आले आहे. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याप्रश्नी लक्ष देण्याची गरज आहे.
-राजेंद्र देशमुख, उद्योजक