म. टा. वृत्तसेवा, सातपूर
संदीप फाउंडेशनमध्ये शिकणाऱ्या मुंबई येथील विद्यार्थिनीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणीसोबत रस्ता ओलांडणाऱ्या मॅकेनिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला दुचाकी चालकाने जोरदार धडक दिली. यामुळे सदर विद्यार्थिनी रस्त्यावर पडून एसटी बसच्या चाकाखाली सापडली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील वाढत्या अपघातांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
संदीप फाउंडेशनमध्ये इंजिनीअरिंग शाखेत शिकणारी हर्षिका सुर्वे सोमवारी (दि. १३) कॉलेज सुटल्यानंतर होस्टेलवर परतण्यासाठी आपल्या मैत्रिणीसोबत रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी एका दुचाकीचालकाने दोघींना जोरदार धडक दिली. यात हर्षिका सुर्वे रस्त्यावर फेकली गेली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने हर्षिका सुर्वे हिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दुचाकीचालकाला ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
गतिरोधकाची मागणी
त्र्यंबकेश्वर रोडवर सातत्याने अपघात होत असल्याने गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले यांनी केली आहे.
संदीप फाउंडेशनमध्ये शिकणाऱ्या मुंबई येथील विद्यार्थिनीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणीसोबत रस्ता ओलांडणाऱ्या मॅकेनिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीला दुचाकी चालकाने जोरदार धडक दिली. यामुळे सदर विद्यार्थिनी रस्त्यावर पडून एसटी बसच्या चाकाखाली सापडली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील वाढत्या अपघातांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
संदीप फाउंडेशनमध्ये इंजिनीअरिंग शाखेत शिकणारी हर्षिका सुर्वे सोमवारी (दि. १३) कॉलेज सुटल्यानंतर होस्टेलवर परतण्यासाठी आपल्या मैत्रिणीसोबत रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी एका दुचाकीचालकाने दोघींना जोरदार धडक दिली. यात हर्षिका सुर्वे रस्त्यावर फेकली गेली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसच्या मागील चाकाखाली सापडल्याने हर्षिका सुर्वे हिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दुचाकीचालकाला ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
गतिरोधकाची मागणी
त्र्यंबकेश्वर रोडवर सातत्याने अपघात होत असल्याने गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावे, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले यांनी केली आहे.