राष्ट्रवादीला सोबत देण्यास विरोध
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भाजपने विधान परिषदेत 'राष्ट्रवादी'ची साथ करण्याचा निर्णय भाजपच्या मतदारांनी आपल्याच पक्षावर उलटविला. राष्ट्रवादीचा साथ अनेकांना पचनी पडली नसल्याने तसेच जातीय समीकरणांमुळे भाजपमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. 'राष्ट्रवादी'सोबत जाण्यास एका गटाने उघडपणे विरोध दर्शविला. त्यामुळे विधान परिषदेत भाजप निर्णायक ठरेल, असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांना गटबाजीने तोंडावर पाडले.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीत शिवसेना व भाजपने अघोषित युती करत ३-३ जागा लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पालघरमध्ये भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना रिंगणात उतरविण्याची खेळी केल्याने भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त झाले. पालघरची परतफेड नाशकात करायची अशा खुणगाठ बांधत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी शिवसेनेला शेवटपर्यंत झुंझत ठेवले. मतदानाला २४ तासाचा अवधी असताना रविवारी (दि. २०) रात्री महामार्गावरील हॉटेल ज्युपिटरमध्ये भाजपच्या मतदारांना बैठकीच्या निमित्ताने एकत्र केले. या बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन आणि संघटनमंत्री किशोर काळकर येणार होते. मात्र, उशिरापर्यंत पालकमंत्री महाजन नाशकात दाखल झाले नाही. राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याबाबत भूमिका घेतल्याचे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मतदारांना कळविले. त्यावर एका गटाने आक्षेप घेतल्याची चर्चा होती. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधण्यात आला. यात भाजप मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीला मतदान करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयानंतर पक्षातंर्गत दोन गट निर्माण झाले. पक्षातील प्रबळ गटाने 'राष्ट्रवादी'सोबत जाण्यास नकार दिला. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याचे आदेश धुडकावत या गटाने शिवसेनेच्या उमेदवारामागे अर्थचक्रानुसार उभे राहण्यावर ठाम राहिला. त्याची प्रत्यक्ष झलकही मतदान केंद्रावर दिसून आली. मतदान जातनिहाय विभागले गेले. भाजप आमदार सीमा हिरे आणि प्रा. देवयानी फरांदे यांनी मतदान प्रक्रियेपासून लांब राहणेच पसंत केले.
व्हीप नाही
राष्ट्रवादीला मतदान करावे यासाठी भाजपने व्हीप बजाविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, व्हीपला पक्षातंर्गत गटबाजी आडवी आल्याची चर्चा आहे. अनेकांनी व्हीप स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे पक्षाला व्हीपचा निर्णय ऐनवेळी मागे घ्यावा लागला. प्रत्यक्षात कायद्याप्रमाणे भाजपचा उमेदवार रिंगणात नसल्याने इतर पक्षाच्या उमेदवारास मतदान करावे, असा व्हीप बजाविता येत नाही. त्यामुळे व्हीप बजाविला नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
आमच्या वरिष्ठांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. वरिष्ठांच्या या निर्णयानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. शिवाजी सहाणे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सहाणे यांचा विजय निश्चित आहे.
- आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भाजपने विधान परिषदेत 'राष्ट्रवादी'ची साथ करण्याचा निर्णय भाजपच्या मतदारांनी आपल्याच पक्षावर उलटविला. राष्ट्रवादीचा साथ अनेकांना पचनी पडली नसल्याने तसेच जातीय समीकरणांमुळे भाजपमध्ये फूट पडल्याचे दिसून आले. 'राष्ट्रवादी'सोबत जाण्यास एका गटाने उघडपणे विरोध दर्शविला. त्यामुळे विधान परिषदेत भाजप निर्णायक ठरेल, असा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांना गटबाजीने तोंडावर पाडले.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीत शिवसेना व भाजपने अघोषित युती करत ३-३ जागा लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पालघरमध्ये भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना रिंगणात उतरविण्याची खेळी केल्याने भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त झाले. पालघरची परतफेड नाशकात करायची अशा खुणगाठ बांधत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी शिवसेनेला शेवटपर्यंत झुंझत ठेवले. मतदानाला २४ तासाचा अवधी असताना रविवारी (दि. २०) रात्री महामार्गावरील हॉटेल ज्युपिटरमध्ये भाजपच्या मतदारांना बैठकीच्या निमित्ताने एकत्र केले. या बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन आणि संघटनमंत्री किशोर काळकर येणार होते. मात्र, उशिरापर्यंत पालकमंत्री महाजन नाशकात दाखल झाले नाही. राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याबाबत भूमिका घेतल्याचे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मतदारांना कळविले. त्यावर एका गटाने आक्षेप घेतल्याची चर्चा होती. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधण्यात आला. यात भाजप मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीला मतदान करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयानंतर पक्षातंर्गत दोन गट निर्माण झाले. पक्षातील प्रबळ गटाने 'राष्ट्रवादी'सोबत जाण्यास नकार दिला. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याचे आदेश धुडकावत या गटाने शिवसेनेच्या उमेदवारामागे अर्थचक्रानुसार उभे राहण्यावर ठाम राहिला. त्याची प्रत्यक्ष झलकही मतदान केंद्रावर दिसून आली. मतदान जातनिहाय विभागले गेले. भाजप आमदार सीमा हिरे आणि प्रा. देवयानी फरांदे यांनी मतदान प्रक्रियेपासून लांब राहणेच पसंत केले.
व्हीप नाही
राष्ट्रवादीला मतदान करावे यासाठी भाजपने व्हीप बजाविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, व्हीपला पक्षातंर्गत गटबाजी आडवी आल्याची चर्चा आहे. अनेकांनी व्हीप स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे पक्षाला व्हीपचा निर्णय ऐनवेळी मागे घ्यावा लागला. प्रत्यक्षात कायद्याप्रमाणे भाजपचा उमेदवार रिंगणात नसल्याने इतर पक्षाच्या उमेदवारास मतदान करावे, असा व्हीप बजाविता येत नाही. त्यामुळे व्हीप बजाविला नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
आमच्या वरिष्ठांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. वरिष्ठांच्या या निर्णयानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. शिवाजी सहाणे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सहाणे यांचा विजय निश्चित आहे.
- आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप