म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची ३५० मुले व विधवा पत्नी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे १८ जुलै रोजी निदर्शने करणार आहेत. तसेच ते पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत.
गेल्या नऊ वर्षांपासून शेतकरी आत्महत्या आणि आपत्तीग्रस्तांची मुले त्र्यंबकेश्वरजवळ आधारतीर्थ आश्रम राहत आहेत. ही मुले १८ जुलै रोजी जंतरमंतर येथे जाऊन एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. तसेच महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची व खासदारांची ते भेट घेणार आहेत. स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेती मालाला हमी भाव द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहेत. इतर शेतकऱ्यांच्या मुलांना आमच्यासारखे अनाथ होऊ देऊ नका, अशी मंत्र्यांना विनंती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांनी या मुलांना भेटी दिल्या आहेत; परंतु अद्याप प्रश्न सुटलेला नाही. आत्महत्याग्रस्त मुले दरवर्षी पंढरपूरची वारी करतात. विदर्भात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करतात. शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका, असे प्रबोधन करतात. या मुलांच्या मागण्यांकडे लक्ष केंद्रीत व्हावे, यासाठी हे एक दिवसीय निदर्शने आंदोलन छेडण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची ३५० मुले व विधवा पत्नी आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे १८ जुलै रोजी निदर्शने करणार आहेत. तसेच ते पंतप्रधानांचीही भेट घेणार आहेत.
गेल्या नऊ वर्षांपासून शेतकरी आत्महत्या आणि आपत्तीग्रस्तांची मुले त्र्यंबकेश्वरजवळ आधारतीर्थ आश्रम राहत आहेत. ही मुले १८ जुलै रोजी जंतरमंतर येथे जाऊन एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहे. तसेच महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची व खासदारांची ते भेट घेणार आहेत. स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेती मालाला हमी भाव द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहेत. इतर शेतकऱ्यांच्या मुलांना आमच्यासारखे अनाथ होऊ देऊ नका, अशी मंत्र्यांना विनंती करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांनी या मुलांना भेटी दिल्या आहेत; परंतु अद्याप प्रश्न सुटलेला नाही. आत्महत्याग्रस्त मुले दरवर्षी पंढरपूरची वारी करतात. विदर्भात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करतात. शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका, असे प्रबोधन करतात. या मुलांच्या मागण्यांकडे लक्ष केंद्रीत व्हावे, यासाठी हे एक दिवसीय निदर्शने आंदोलन छेडण्यात येणार आहे.