म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्यभर १ ते १० जून दरम्यान होणाऱ्या शेतकरी संपात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्यने सहभागी होणार आहेत. त्यासाठी तालुकानिहाय बैठका होत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शांततेच्या मार्गाने हा संप करण्याचे ठरविण्यात आले आहे.
तालुक्यातील गिरणारे येथे बुधवारी शेतकऱ्यांची बैठक झाली. संप काळात शेतकऱ्यांनी आपल्या घरांवर काळे झेंडे लावून शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्याचा निर्णय घेतला.
या संपासाठी गावागावात शेत वस्तीवर पत्रके वाटणे, फ्लेक्स बोर्ड लावणे, मोटारसायकल रॅली काढणे, गाव परिसरात शेतीमाल विक्री १०० टक्के बंद ठेवणे, बाहेरून येणारा शेतीमाल विक्रीला प्रतिबंध करणे, भाजीपाला विक्रीला १०० टक्के प्रतिबंध करणे यासारखे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे या संपाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या संपकाळात लग्न कार्यातील चालीरितींनाही कात्री लावण्यात आली आहे. त्यात हळद कार्यक्रमातील जेवणावळी, लग्नातील टोपी फेटे बंद, साखरपुडा, बस्ते घरगुती साधे पद्धतीने करण्याचा ठराव करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा संप शांततेने करून यशस्वी करण्याचा निर्धारही व्यक्त केला जात आहे. शेतकरी संपात फूट पाडणारे शेतकरी द्रोही ठरतील असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. गिरणारे येथील बैठकीत पुंडलकि थेटे, निवृत्ती घुले, बाळासाहेब हांडोरे, परसराम गायकर, भिकाभाऊ थेटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
रसद तोडण्याचा निर्णय
पंचवटी : शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातून भाजीपाला, दूध, अन्नधान्य आदींची विक्री बंद करण्यात येणार आहे. नाशिकहून मुंबई आणि गुजरातमध्ये जाणारा शेतमाल पाठविणे बंद करावा, यासाठी शेतकऱ्यांना नाशिक कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रबोधन करण्यात आले.
शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी समिती स्थापन करून फलक लावणे, पत्रके पोहचविण्याचे काम करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. विष्णुपंत म्हैसधूणे, सचिन पिंगळे, राम खुर्दळ, भाऊसाहेब ढिकले आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी राजकीय जोडे बाहेर काढून संपात सहभागी व्हावे. शेतकऱ्यांविषयी लोकप्रतिनिधींना कळवळा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संप करण्याची वेळ आली आहे. या संपासाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये जागृती झाली आहे. मात्र शहराजवळच्या भागात २० ते २५ किलोमीटरच्या भागातून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो या भागातील शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. गावाकडून शहराकडे जाणारे मार्ग गाव पातळीवरच बंद करण्यात यावे. शहरातील रसद बंद करावी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा संप होत असल्याने शेतकरी या संपात सहभागी होणार आहेत.
संपाच्या काळात शेतकऱ्याच्या वाहनांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. दूध उत्पादन करणाऱ्याचे प्रबोधन करताना दुधापासून विविध पदार्थ तयार करण्याची तयारी ठेवण्याची मानसिकता तयार करावी. या संपाच्या तयारीसाठी लागणारा खर्च मराठा क्रांती मोर्चाच्या उरलेल्या पैशातून करावा, अशी सूचना करण गायकर यांनी केली.
वकील संघाचा पाठिंबा
येवला ः एक जूनपासून सुरू होणाऱ्या शेतकरी संपाला येवला वकील संघाने पाठिंबा जाहीर केला आहे. वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश गायकवाड यांनी या पाठिंब्याबाबत माहिती दिली. नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी आदी समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे त्याने हक्कांसाठी लढणे योग्य आहे. या संपकाळात जर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले तर येवला वकील संघ मोफत न्यायालयीन लढा देणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.
राज्यभर १ ते १० जून दरम्यान होणाऱ्या शेतकरी संपात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्यने सहभागी होणार आहेत. त्यासाठी तालुकानिहाय बैठका होत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शांततेच्या मार्गाने हा संप करण्याचे ठरविण्यात आले आहे.
तालुक्यातील गिरणारे येथे बुधवारी शेतकऱ्यांची बैठक झाली. संप काळात शेतकऱ्यांनी आपल्या घरांवर काळे झेंडे लावून शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्याचा निर्णय घेतला.
या संपासाठी गावागावात शेत वस्तीवर पत्रके वाटणे, फ्लेक्स बोर्ड लावणे, मोटारसायकल रॅली काढणे, गाव परिसरात शेतीमाल विक्री १०० टक्के बंद ठेवणे, बाहेरून येणारा शेतीमाल विक्रीला प्रतिबंध करणे, भाजीपाला विक्रीला १०० टक्के प्रतिबंध करणे यासारखे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे या संपाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या संपकाळात लग्न कार्यातील चालीरितींनाही कात्री लावण्यात आली आहे. त्यात हळद कार्यक्रमातील जेवणावळी, लग्नातील टोपी फेटे बंद, साखरपुडा, बस्ते घरगुती साधे पद्धतीने करण्याचा ठराव करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा संप शांततेने करून यशस्वी करण्याचा निर्धारही व्यक्त केला जात आहे. शेतकरी संपात फूट पाडणारे शेतकरी द्रोही ठरतील असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. गिरणारे येथील बैठकीत पुंडलकि थेटे, निवृत्ती घुले, बाळासाहेब हांडोरे, परसराम गायकर, भिकाभाऊ थेटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
रसद तोडण्याचा निर्णय
पंचवटी : शेतकरी संप यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातून भाजीपाला, दूध, अन्नधान्य आदींची विक्री बंद करण्यात येणार आहे. नाशिकहून मुंबई आणि गुजरातमध्ये जाणारा शेतमाल पाठविणे बंद करावा, यासाठी शेतकऱ्यांना नाशिक कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रबोधन करण्यात आले.
शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी समिती स्थापन करून फलक लावणे, पत्रके पोहचविण्याचे काम करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. विष्णुपंत म्हैसधूणे, सचिन पिंगळे, राम खुर्दळ, भाऊसाहेब ढिकले आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी राजकीय जोडे बाहेर काढून संपात सहभागी व्हावे. शेतकऱ्यांविषयी लोकप्रतिनिधींना कळवळा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना संप करण्याची वेळ आली आहे. या संपासाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये जागृती झाली आहे. मात्र शहराजवळच्या भागात २० ते २५ किलोमीटरच्या भागातून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो या भागातील शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. गावाकडून शहराकडे जाणारे मार्ग गाव पातळीवरच बंद करण्यात यावे. शहरातील रसद बंद करावी. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा संप होत असल्याने शेतकरी या संपात सहभागी होणार आहेत.
संपाच्या काळात शेतकऱ्याच्या वाहनांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. दूध उत्पादन करणाऱ्याचे प्रबोधन करताना दुधापासून विविध पदार्थ तयार करण्याची तयारी ठेवण्याची मानसिकता तयार करावी. या संपाच्या तयारीसाठी लागणारा खर्च मराठा क्रांती मोर्चाच्या उरलेल्या पैशातून करावा, अशी सूचना करण गायकर यांनी केली.
वकील संघाचा पाठिंबा
येवला ः एक जूनपासून सुरू होणाऱ्या शेतकरी संपाला येवला वकील संघाने पाठिंबा जाहीर केला आहे. वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश गायकवाड यांनी या पाठिंब्याबाबत माहिती दिली. नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी आदी समस्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे त्याने हक्कांसाठी लढणे योग्य आहे. या संपकाळात जर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले तर येवला वकील संघ मोफत न्यायालयीन लढा देणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.