म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी
खेडगाव येथील तरूण द्राक्ष उत्पादक शेतकरी माणिक अशोक रणदिवे यांनी शनिवारी (दि. २२ एप्रिल) पहाटे शेताजवळील झाडाला दोर बांधून गळफास घेत जीवन संपविले. नाशिक जिल्ह्यातील ही २५वी शेतकरी आत्महत्या आहे.
माणिक रणदिवे यांची साडेतीन एकर शेती असून, सर्व द्राक्षबाग आहे. मागील चार ते पाच वर्षे झालेल्या नुकसानीमुळे त्याचे वडील अशोक रणदिवे यांच्या नावावर सुमारे दहा लाख रुपये कर्ज झाले होते. यंदा चांगले उत्पन्न येऊनही शेवटच्या टप्प्यात द्राक्षाचे बाजारभाव अगदी दहा ते बारा रुपये किलोवर आल्याने माणिक यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
शेतकरी संपावर!
शेतकरी आत्महत्या लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या प्रमुख मागणीसाठी निफाड तालुक्यातील शेतकरी १ जून रोजी बेमुदत संपावर जाणार आहेत.
खेडगाव येथील तरूण द्राक्ष उत्पादक शेतकरी माणिक अशोक रणदिवे यांनी शनिवारी (दि. २२ एप्रिल) पहाटे शेताजवळील झाडाला दोर बांधून गळफास घेत जीवन संपविले. नाशिक जिल्ह्यातील ही २५वी शेतकरी आत्महत्या आहे.
माणिक रणदिवे यांची साडेतीन एकर शेती असून, सर्व द्राक्षबाग आहे. मागील चार ते पाच वर्षे झालेल्या नुकसानीमुळे त्याचे वडील अशोक रणदिवे यांच्या नावावर सुमारे दहा लाख रुपये कर्ज झाले होते. यंदा चांगले उत्पन्न येऊनही शेवटच्या टप्प्यात द्राक्षाचे बाजारभाव अगदी दहा ते बारा रुपये किलोवर आल्याने माणिक यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
शेतकरी संपावर!
शेतकरी आत्महत्या लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या प्रमुख मागणीसाठी निफाड तालुक्यातील शेतकरी १ जून रोजी बेमुदत संपावर जाणार आहेत.