अवनखेडला
शेतकरी आत्महत्या
दिंडोरी : तालुक्यातील अवनखेड येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. नोव्हेंबरमध्ये तालुक्यातील ही तिसरी तर चालू वर्षातील बारावी शेतकरी आत्महत्या आहे. अवनखेड येथील शेतकरी शंकर मुरलीधर वसाळ (वय ५५) यांनी गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास झाडावर दोरीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. वसाळ यांच्यावर सोसायटी व एक राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज असल्याचे समजते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. दिंडोरी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.