मनमाड : जवळकी (ता. नांदगाव) येथील काशिनाथ श्रावण गायकवाड (वय ५०) यांनी मंगळवारी सायंकाळी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून विष प्राशन केले होते. मंगळवारी रात्री औरंगाबाद येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दीड ते पावणेदोन लाखांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
नांदगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या
जवळकी (ता नांदगाव) येथील काशिनाथ श्रावण गायकवाड (वय ५०) यांनी मंगळवारी सायंकाळी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून विष प्राशन केले होते...
Maharashtra Times 11 Oct 2018, 4:00 am