म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून पावसाने संपूर्ण तालुक्यावर कृपादृष्टी दाखविल्याने पिके डौलदार होत आहेत. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी बहुतेक शेतकरी खते खरेदी करण्यासाठी बाजारात येत आहेत. मात्र दिवसदिवसभर रांगेत उभे राहून खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतेक शेतकरी आदिवासी बांधव आहेत. अनेक शेतकरी पाड्यांवर, डोंगर भागात राहतात. त्यातच सध्या करोनामुळे खासगी वाहतूक बंद असल्याने त्यांना पायपीट करीत त्र्यंबकेश्वर येथे यावे लागते. मात्र तालुक्याच्या ठिकाणी येवूनही त्यांना खते मिळत नसल्याने हात हालवत सायंकाळी परत फिरावे लागत आहे. एखाद्या दुकानात खते आहेत आहे असे कळताच त्या दुकानाबाहेर रांगा लागतात. मात्र काही वेळातच खते संपली असे सांगून पुरवठादार शटर डाऊन करीत असल्याने पुढे करायचे काय? असा सवाल या शेतकऱ्यांपुढे उपस्थित होत आहे.
याबाबत तालुका कृषी खाते आणि पंचायत समितीचा कृषी विभाग दोन्ही यंत्रणा शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष देत नाही, अशी ओरड तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. खतांचा तुटवड्याकडे लोकप्रतिनिधीदेखील दुर्लक्ष करीत असल्याने हे गाऱ्हाणे मांडायचे तरी कोणाकडे असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
पिकविम्यापासून शेकडो वंचित
पिक विम्याच्याबाबत देखील शासन यंत्रणांनी अशीच उदासीनता दाखविल्याने अनेक शेतकरी त्याच्या लाभापासून वंचित आहेत. पिक विम्यासाठी कागदपत्रांची उपलब्धता वेळेवर झाली नाही. त्यातच ऑनलाइन विमा भरा म्हणून कृषी विभागाचे कर्मचारी ई-सेवा केंद्रांकडे बोट दाखवून मोकळे झाले. दरम्यान कृषी सहायकांनी याबाबत मागर्दशन करणे, पिक विमा भरून घेणे आवश्यक होते. मात्र तसे घडले नाही. तालुक्यातील अनेकांना याचा फटका बसला आहे.
जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून पावसाने संपूर्ण तालुक्यावर कृपादृष्टी दाखविल्याने पिके डौलदार होत आहेत. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी बहुतेक शेतकरी खते खरेदी करण्यासाठी बाजारात येत आहेत. मात्र दिवसदिवसभर रांगेत उभे राहून खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतेक शेतकरी आदिवासी बांधव आहेत. अनेक शेतकरी पाड्यांवर, डोंगर भागात राहतात. त्यातच सध्या करोनामुळे खासगी वाहतूक बंद असल्याने त्यांना पायपीट करीत त्र्यंबकेश्वर येथे यावे लागते. मात्र तालुक्याच्या ठिकाणी येवूनही त्यांना खते मिळत नसल्याने हात हालवत सायंकाळी परत फिरावे लागत आहे. एखाद्या दुकानात खते आहेत आहे असे कळताच त्या दुकानाबाहेर रांगा लागतात. मात्र काही वेळातच खते संपली असे सांगून पुरवठादार शटर डाऊन करीत असल्याने पुढे करायचे काय? असा सवाल या शेतकऱ्यांपुढे उपस्थित होत आहे.
याबाबत तालुका कृषी खाते आणि पंचायत समितीचा कृषी विभाग दोन्ही यंत्रणा शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष देत नाही, अशी ओरड तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. खतांचा तुटवड्याकडे लोकप्रतिनिधीदेखील दुर्लक्ष करीत असल्याने हे गाऱ्हाणे मांडायचे तरी कोणाकडे असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
पिकविम्यापासून शेकडो वंचित
पिक विम्याच्याबाबत देखील शासन यंत्रणांनी अशीच उदासीनता दाखविल्याने अनेक शेतकरी त्याच्या लाभापासून वंचित आहेत. पिक विम्यासाठी कागदपत्रांची उपलब्धता वेळेवर झाली नाही. त्यातच ऑनलाइन विमा भरा म्हणून कृषी विभागाचे कर्मचारी ई-सेवा केंद्रांकडे बोट दाखवून मोकळे झाले. दरम्यान कृषी सहायकांनी याबाबत मागर्दशन करणे, पिक विमा भरून घेणे आवश्यक होते. मात्र तसे घडले नाही. तालुक्यातील अनेकांना याचा फटका बसला आहे.