अ‍ॅपशहर

द्राक्षबागा संकटातशेतकरी बसले उपोषणाला

परिसरातील कारसूळ, नारायण टेंभी, नजीक वडाळी येथील द्राक्षबागा पाण्याअभावी संकटात सापडल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी कादवा नदी पत्रात पाणी सोडावे या मागणीसाठी कारसूळ गावातील राममंदिरासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स 27 Dec 2018, 7:55 am
म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम grapes


परिसरातील कारसूळ, नारायण टेंभी, नजीक वडाळी येथील द्राक्षबागा पाण्याअभावी संकटात सापडल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी कादवा नदी पत्रात पाणी सोडावे या मागणीसाठी कारसूळ गावातील राममंदिरासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

कादवा नदीवरील रौळस बंधाऱ्यात पाणी नसल्याने परिसरातील सहाशे ते सातशे हेक्टरवरील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. प्रशासनाने सिंचनासाठी

कादवा नदी पात्रात पाणी सोडावे या मागणीचे निवेदन प्रशासनास २४ रोजी देण्यात आले होते. मात्र प्रशासनाने कुठलाही उपाययोजना न केल्याने

कारसूळ गावातील राम मंदिर परिसरात बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.

यावेळी भाऊसाहेब शंकपाळ, देवेंद्र काजळे, उत्तम शंकपाळ, नंदू पगार, अजय गवळी, ओमप्रकाश ताकाटे, सुहास शंकपाळ, संतोष जाधव, कैलास पगार, उद्धव काजळे, सचिन पगार, जीवन वाघचौरे, अण्णा शंकपाळ, प्रकाश काजळे, अमोल ताकाटे, नितीन ताकाटे, बाळासाहेब गवळी आदी उपोषणाला बसले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज