मालेगाव : तालुक्यातील ढवळेश्वर येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याने बुधवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आनंदा गंभीर आहिरे (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. आहिरे यांच्या नावे एक हेक्टर १९ गुंठे एवढी सामूहिक शेती आहे. २०१५ साली कर्जमाफी योजनेचा त्यांच्या वडिलांना लाभ झाला होता. त्यानंतर मात्र त्यांच्यावर कोणतेही कर्ज नसल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, भावंडे असा परिवार आहे.
शेतकऱ्याची आत्महत्या
तालुक्यातील ढवळेश्वर येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याने बुधवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2019, 4:00 am