अ‍ॅपशहर

मुलीच्या लग्नानंतर शेतकऱ्याची आत्महत्या

मुलीचे बुधवारी वेहेळगाव (ता. नांदगाव) येथे लग्न लावून अवघे चोवीस तास उलटत नाही तोच वधुपिता शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Times 18 May 2017, 10:35 pm
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers suicide after girls marriage in kalwan
मुलीच्या लग्नानंतर शेतकऱ्याची आत्महत्या


मुलीचे बुधवारी वेहेळगाव (ता. नांदगाव) येथे लग्न लावून अवघे चोवीस तास उलटत नाही तोच वधुपिता शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील पारेगाव येथील राजेंद्र बाबूराव खेडकर असे आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्याचे नाव असून, त्याने शेती विकून मुलीचे लग्न लावल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे कुटुंबीयांनी सांगितल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

दुसरी घटना निफाड तालुक्यातील पिंपरी (रौळस) येथे घडली असून, सागर गंगाधर शंखपाळ (वय १९) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या वडिलांच्या नावावर शेती असून, चार लाख रुपये सोसायटीचे कर्ज आहे. गंगाधर शंखपाळ यांचा तो एकुलता मुलगा होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज