कळवण : गेल्या तीन वर्षांपूर्वी कळवण ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम न केल्याने या कर्मचाऱ्यांची वाताहत झाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन व १०० टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी सर्व कर्मचारी संघटनेने प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विक्रम निकम, ताराबाई गोयर, जिजाबाई बस्ते, अशोक अहिरे, संजय आहेर, लक्ष्मण पगार, भाऊराव पगार, रामराव सोनवणे, बापू आहेर, किरण निकम, कैलास पगार असे एकूण ४१ कर्मचारी उपोषणात सहभागी झाले आहेत .
कळवण नगरपंचायतकर्मचाऱ्यांचे उपोषण
गेल्या तीन वर्षांपूर्वी कळवण ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्यात आले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2020, 4:00 am