म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बनावट प्रमाणपत्रप्रकरणी शहरातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा प्रशिक्षक अशोक दुधारे यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. दुधारे हे एकटे या प्रकरणाला जबाबदार नसून, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास झाला पाहिजे, अशी प्रतिक्रीया शहरातील मान्यवरांनी व्यक्त केली.
सरकारने खेळाडूंसाठी नोकरीत ५ टक्के आरक्षण आणि शालेय विद्यार्थ्यांना २५ टक्के गुण देणे हे प्रेरणा देण्यासाठी आहे. परंतु या योजनेमुळे खेळाडूंचा खेळ थांबला आहे असे मला वाटते. ग्रेस गुण मिळाल्यानंतर तसेच पाच टक्के आरक्षणात नोकरी लागल्यानंतर खेळाडूंचा खेळ थांबतो. गुणांमुळे बाजाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळते. या प्रकाणाला खेळाडू, पालक, शिक्षक,असोसिएशन असे सर्व जबाबदार आहे असे मला वाटते.
-रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी
खरं तर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. जे काही प्रकरण झाले ते नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला काळीमा फासणारे आहे. अशा प्रकरणांमुळे पालकांचा, खेळाडूंचा खेळाकडे पहाण्याचा दृष्टी बदलतो. व्हेरिफिकेशन एक व्यक्ती कधीच करीत नाही ती दहा लोकांची एक साखळी असते. त्यामुळे सर्वच थरातून चौकशी व्हायला पाहिजे.
-साहेबराव पाटील, क्रीडा प्रशिक्षक
ही न्यायप्रविष्ठ बाब असल्याने त्यावर प्रतिक्रीया देणे उचित होणार नाही. परंतु क्रीडा विभागाने यासाठी कडक नियमावली तयार करणे गरजेचे आहे. एखादी स्पर्धा आयोजित केल्यानंतर त्याची माहिती त्या संघटनेच्या व क्रीडा विभागाच्या वेबसाइटवर टाकावी. तसेच स्पर्धा झाल्यानंतर ४८ तासाच्या आत खेळांचे निकाल असोसिएशनच्या व क्रीडा खात्याच्या वेबसाइटवर खेळाडूंच्या सविस्तर माहितीसह अपलोड करावेत. तसेच अशा प्रकरणांमुळे ज्यांना नोकरी लागली आहे अशा पाच वर्षात नोकरी मिळालेल्या उमेदवारांची चौकशी करण्यात यावी.
-मंदार देशमुख, खो-खो प्रशिक्षक
इतरही काही चौकशीची प्रकरणे बाकी असतील त्याची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने त्वरीत चौकशी करून त्यात जर असा प्रकार करणारा कोणी आढल्यास त्यावर कारवाई करावी. महाराष्ट्र शासनाने यासाठी एक ज्येष्ठ संघटकांची समिती नेमून कडक नियमावली करून अश्या प्रवृत्तीला कायम स्वरूपी चाप बसेल यासाठी उपाय केले पाहिजे.
-नरेंद्र छाजेड, ज्येष्ठ क्रीडा संघटक
वास्तविक ज्या खेळात बनावट प्रकार घडला तो खेळ विद्यापीठात खेळला जात नाही. थोडक्यात काय तर मर्यादीत स्वरुपात हा खेळ खेळला जातो हे नक्कीच. खेळाडू भरती प्रक्रिया शाळेत किंवा महाविद्यालयात असेल तर क्रीडा अधिकारी, विद्यापीठाची समिती असते तर असोसिएशनमध्ये असे तटस्थ सदस्य का नको. ज्या खेळांना मान्यताप्राप्त आहे त्या खेळात स्पर्धा ही मोठ्या प्रमाणात आहे. विद्यापीठ कायदा २०१६ च्या कलम ५६-५७मध्ये आता कुलगुरूंपासून क्रीडा शिक्षक या सर्वांना जबाबदारी निश्चित केली आहे. तशी असोसिएशनवर का नाही. ज्यांनी हा उद्योग केला त्या साखळीतील सर्वांवर कारवाई झाली पाहिजे.
-प्रा. डॉ हरीष आडके, पंचवटी नासिक
बनावट प्रमाणपत्रप्रकरणी शहरातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा प्रशिक्षक अशोक दुधारे यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. दुधारे हे एकटे या प्रकरणाला जबाबदार नसून, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास झाला पाहिजे, अशी प्रतिक्रीया शहरातील मान्यवरांनी व्यक्त केली.
सरकारने खेळाडूंसाठी नोकरीत ५ टक्के आरक्षण आणि शालेय विद्यार्थ्यांना २५ टक्के गुण देणे हे प्रेरणा देण्यासाठी आहे. परंतु या योजनेमुळे खेळाडूंचा खेळ थांबला आहे असे मला वाटते. ग्रेस गुण मिळाल्यानंतर तसेच पाच टक्के आरक्षणात नोकरी लागल्यानंतर खेळाडूंचा खेळ थांबतो. गुणांमुळे बाजाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळते. या प्रकाणाला खेळाडू, पालक, शिक्षक,असोसिएशन असे सर्व जबाबदार आहे असे मला वाटते.
-रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी
खरं तर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. जे काही प्रकरण झाले ते नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला काळीमा फासणारे आहे. अशा प्रकरणांमुळे पालकांचा, खेळाडूंचा खेळाकडे पहाण्याचा दृष्टी बदलतो. व्हेरिफिकेशन एक व्यक्ती कधीच करीत नाही ती दहा लोकांची एक साखळी असते. त्यामुळे सर्वच थरातून चौकशी व्हायला पाहिजे.
-साहेबराव पाटील, क्रीडा प्रशिक्षक
ही न्यायप्रविष्ठ बाब असल्याने त्यावर प्रतिक्रीया देणे उचित होणार नाही. परंतु क्रीडा विभागाने यासाठी कडक नियमावली तयार करणे गरजेचे आहे. एखादी स्पर्धा आयोजित केल्यानंतर त्याची माहिती त्या संघटनेच्या व क्रीडा विभागाच्या वेबसाइटवर टाकावी. तसेच स्पर्धा झाल्यानंतर ४८ तासाच्या आत खेळांचे निकाल असोसिएशनच्या व क्रीडा खात्याच्या वेबसाइटवर खेळाडूंच्या सविस्तर माहितीसह अपलोड करावेत. तसेच अशा प्रकरणांमुळे ज्यांना नोकरी लागली आहे अशा पाच वर्षात नोकरी मिळालेल्या उमेदवारांची चौकशी करण्यात यावी.
-मंदार देशमुख, खो-खो प्रशिक्षक
इतरही काही चौकशीची प्रकरणे बाकी असतील त्याची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने त्वरीत चौकशी करून त्यात जर असा प्रकार करणारा कोणी आढल्यास त्यावर कारवाई करावी. महाराष्ट्र शासनाने यासाठी एक ज्येष्ठ संघटकांची समिती नेमून कडक नियमावली करून अश्या प्रवृत्तीला कायम स्वरूपी चाप बसेल यासाठी उपाय केले पाहिजे.
-नरेंद्र छाजेड, ज्येष्ठ क्रीडा संघटक
वास्तविक ज्या खेळात बनावट प्रकार घडला तो खेळ विद्यापीठात खेळला जात नाही. थोडक्यात काय तर मर्यादीत स्वरुपात हा खेळ खेळला जातो हे नक्कीच. खेळाडू भरती प्रक्रिया शाळेत किंवा महाविद्यालयात असेल तर क्रीडा अधिकारी, विद्यापीठाची समिती असते तर असोसिएशनमध्ये असे तटस्थ सदस्य का नको. ज्या खेळांना मान्यताप्राप्त आहे त्या खेळात स्पर्धा ही मोठ्या प्रमाणात आहे. विद्यापीठ कायदा २०१६ च्या कलम ५६-५७मध्ये आता कुलगुरूंपासून क्रीडा शिक्षक या सर्वांना जबाबदारी निश्चित केली आहे. तशी असोसिएशनवर का नाही. ज्यांनी हा उद्योग केला त्या साखळीतील सर्वांवर कारवाई झाली पाहिजे.
-प्रा. डॉ हरीष आडके, पंचवटी नासिक