अ‍ॅपशहर

मित्रांच्या मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू

दारू पिण्याच्या कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीत रिक्षाचालक तरुणाचा खून झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.

Maharashtra Times 17 Oct 2017, 4:32 am
म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fight with friends
मित्रांच्या मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू


दारू पिण्याच्या कारणावरून मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीत रिक्षाचालक तरुणाचा खून झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.

विशाल दावल हिरे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय बोरसे यांनी फिर्याद दिली. संजय यांच्यासह सुनंदा आणि विशाल हे सर्वजण एकत्र राहतात. विशाल यास दोन बहिणी असून त्यांचे लग्न झालेले आहेत. विशाल हा रिक्षा चालवितो. घरी आल्यावर विशाल न दिसल्याने संजय यांनी याबाबत चौकशी केली. विशाल हा सागर शिंदे, दीपक पगारे आणि प्रमोद जाधव यांच्यासोबत बाहेर गेल्याचे समजले. रात्री नाशिकरोड पोलिसंनी ‘विशालची तब्येत गंभीर असून तुम्ही तातडीने इंदिरानगर पोलिस ठाण्यात जा’ असा निरोप दिला. त्यानुसार संजय व विशाल याची आई दोघेही इंदिरानगर पोलिसात गेले. त्यांना वडनेर चौफुलीकडे जाण्यास सांगण्यात आले. तेथे गेल्यावर शस्त्राने वार करण्यात आल्याने विशालचा मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले. संजय यांनी तातडीने इंदिरानगर पोलिस ठाणे गाठून सागर शिंदे (रा. वडाळागाव), दीपक पगारे (देवळाली गाव) आणि प्रमोद जाधव (रा. नाशिकरोड) यांच्याविरूद्ध तक्रार दिली. पोलिसांनी या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज