म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
त्र्यंबक नगर परिषदेने नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. सात दिवसांच्या आत हा कर भरला नाही तर स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती कारवाई होणार आहे. त्याच सोबत थकबाकीदारांची नावे जाहीर प्रसिद्ध करणे, नळकनेक्शन तोडणे आदी पर्याय वापरण्यात येणार आहेत.
नगर परिषद प्रशासनाने पालिकेच्या कर वसुलीच्या बाबत नागरिकांनी नेहमीच सहकार्य ठेवले आहे. किंबहुना गत काही वर्षांपासून पूर्वीची आणि नव्याने हद्दीत समावेश झालेल्या मालमत्तांच्याबाबत अवास्ताव दराने कर आकारणी करण्यात आली आहे. सन २००७ पासून दरसाल मार्च ते जून असे सरासरी चार महिने एक दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येतो. दररोजचा पुरवठा देखील समाधान कारक नसतो. शहरात डासांचा प्रादुर्भाव बाराही महिने कायम राहीला आहे. पथदिपाबाबत ऐन दिवाळीत अंधार होता. सफाई ठेकेदाराचे बील वेळेत आदा न केल्याने सणासुदीत घंटागाडी आली नाही. अशा एक ना अनेक समस्या असतांनाही नागरिक कर भरत होते. परंतु पालिकेने आता थेट जप्तीच्या कारवाईचा इशारा दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्र्यंबक नगर परिषदेने नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. सात दिवसांच्या आत हा कर भरला नाही तर स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती कारवाई होणार आहे. त्याच सोबत थकबाकीदारांची नावे जाहीर प्रसिद्ध करणे, नळकनेक्शन तोडणे आदी पर्याय वापरण्यात येणार आहेत.
नगर परिषद प्रशासनाने पालिकेच्या कर वसुलीच्या बाबत नागरिकांनी नेहमीच सहकार्य ठेवले आहे. किंबहुना गत काही वर्षांपासून पूर्वीची आणि नव्याने हद्दीत समावेश झालेल्या मालमत्तांच्याबाबत अवास्ताव दराने कर आकारणी करण्यात आली आहे. सन २००७ पासून दरसाल मार्च ते जून असे सरासरी चार महिने एक दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येतो. दररोजचा पुरवठा देखील समाधान कारक नसतो. शहरात डासांचा प्रादुर्भाव बाराही महिने कायम राहीला आहे. पथदिपाबाबत ऐन दिवाळीत अंधार होता. सफाई ठेकेदाराचे बील वेळेत आदा न केल्याने सणासुदीत घंटागाडी आली नाही. अशा एक ना अनेक समस्या असतांनाही नागरिक कर भरत होते. परंतु पालिकेने आता थेट जप्तीच्या कारवाईचा इशारा दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.