म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड
गंगापूर धरणातून निघणाऱ्या उजव्या कालव्यावर ठिकठिकाणी अतिक्रमणांची जणू स्पर्धाच लागली आहे. महाराष्ट्र शासनाचे जमाबंदी आयुक्त सेतूराम चोकलिंगम यांनी कालव्यावरील अतिक्रमणांची माहिती सरकारला तत्काळ देण्याचे आदेश दिले होते. यानंतरही एका खासगी शिक्षण संस्थेने प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कालव्यावर संरक्षक भिंत बांधली आहे.
विशेष म्हणजे संबंधित संस्था चालकाला कालव्यात भिंत बांधण्या अगोदर नोटीसही बजावण्यात आली होती. असे असताना कालव्यावरील अतिक्रमणांना कोणाचा सहारा आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडाका लावला आहे. दुसरीकडे
शहरालगत उजव्या कालव्यावर अतिक्रमण काढण्याबाबत सरकारच्या जमाबंदी आयुक्तांनी आदेश दिले असतानाही दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. संबंधित अतिक्रमणांना जबाबदार असणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.
गंगापूर धरणाला अगदी लागून एका बड्या शिक्षण संस्थेने उजवा कालवा बुजवून संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले होते. याबाबत जलसिंचन विभागाने केवळ संबंधित
संस्थेला नोटीस बजावून हात झटकले. परंतु संस्था चालकाने नोटीस दिल्यावर केवळ काही जागा सोडून देत संरक्षक भिंतीचे अतिक्रमण केले आहे. यात प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी 'अर्थ'पूर्ण संबध असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गंगापूर धरणातून निघणाऱ्या उजव्या कालव्यावर ठिकठिकाणी अतिक्रमणांची जणू स्पर्धाच लागली आहे. महाराष्ट्र शासनाचे जमाबंदी आयुक्त सेतूराम चोकलिंगम यांनी कालव्यावरील अतिक्रमणांची माहिती सरकारला तत्काळ देण्याचे आदेश दिले होते. यानंतरही एका खासगी शिक्षण संस्थेने प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कालव्यावर संरक्षक भिंत बांधली आहे.
विशेष म्हणजे संबंधित संस्था चालकाला कालव्यात भिंत बांधण्या अगोदर नोटीसही बजावण्यात आली होती. असे असताना कालव्यावरील अतिक्रमणांना कोणाचा सहारा आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडाका लावला आहे. दुसरीकडे
शहरालगत उजव्या कालव्यावर अतिक्रमण काढण्याबाबत सरकारच्या जमाबंदी आयुक्तांनी आदेश दिले असतानाही दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. संबंधित अतिक्रमणांना जबाबदार असणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे.
गंगापूर धरणाला अगदी लागून एका बड्या शिक्षण संस्थेने उजवा कालवा बुजवून संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले होते. याबाबत जलसिंचन विभागाने केवळ संबंधित
संस्थेला नोटीस बजावून हात झटकले. परंतु संस्था चालकाने नोटीस दिल्यावर केवळ काही जागा सोडून देत संरक्षक भिंतीचे अतिक्रमण केले आहे. यात प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी 'अर्थ'पूर्ण संबध असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी होत आहे.