अ‍ॅपशहर

फटाके व्यापारी सापडले कचाट्यात

औरंगाबादमध्ये गेल्यावर्षी फटाक्याच्या दुकानांना लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्रीबाबत निर्बंध आणले आहेत. यंदा निवासी क्षेत्रात फटाक्याचे गाळे लावता येणार नसून, ज्याठिकाणी मनुष्यवस्ती नाही अशा ठिकाणी फटाक्यांची विक्री करावी लागणार आहे.

Maharashtra Times 12 Oct 2017, 4:00 am
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे माल उरण्याची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fireworks merchant issue at nashik
फटाके व्यापारी सापडले कचाट्यात


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औरंगाबादमध्ये गेल्यावर्षी फटाक्याच्या दुकानांना लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने फटाके विक्रीबाबत निर्बंध आणले आहेत. यंदा निवासी क्षेत्रात फटाक्याचे गाळे लावता येणार नसून, ज्याठिकाणी मनुष्यवस्ती नाही अशा ठिकाणी फटाक्यांची विक्री करावी लागणार आहे. फटाक्याचा व्यवसाय करायचा की नाही अशा विवंचनेत व्यापारी सापडला आहे.

फटाक्याची सर्वात मोठी बाजारपेठ शिवाकाशी येथे आहे. येथे छोटे मोठे अनेक कारखाने असून, तेथून भारताच्या बहुतांश भागात माल पाठवला जातो, मात्र यंदा नोटांवर निर्बंध आल्याने येथील कारखानदारांना पैसा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे फटाक्यासाठी लागणारा कच्चा मालही उपलब्ध झाला नाही. त्याचा परिणाम म्हणून मालाचे उत्पादन नेहमीपेक्षा ५० टक्के कमी झाले.

जीएसटीने वाढविली अडचण

यासोबतच जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर, व्यवहार कसा करायचा याचे मार्गदर्शन नसल्याने व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे अडचणीत आणखी भर पडली. तसेच रहिवाशी क्षेत्रात फटाके विक्री करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने अनेक व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. नाशिक महापालिकेने दिलेले गाळे हे शहराबाहेर असून, तेथे फटाके विकत घेण्यासाठी कुणी येईल का? असा प्रश्न व्यापाऱ्यांना सतावतोय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज