म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक
गांधी कुटूंब आणि नंदूरबारमधील आदिवासींचे एक अतुट नाते राहीले असून लोकसभा असो की,विधानसभा गांधी कुटूंबाकडून प्रचाराचा नारळ नंदूरबार मधूनच फोडला जातो.इंदीरा गांधीपासूनची ही परंपरा आजही कायम असून आता सोनिया गांधीपाठोपाठ प्रियंका गांधीचे राजकारणातील पदार्पण आता नंदूरबार मधूच करण्याची तयारी सुरू आहे. देशातील लोकसभेच्या प्रचाराचा नारळ प्रियंका गांधीच्या हस्ते नंदूरबारमधून फुटावा यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी प्रियंकालाच साकडे घालण्यात आले आहे.त्यासाठी प्रियंका गांधीसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पत्र पाठवण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूकांचा बिगूल वाजण्यास सुरूवात झाली असून भाजप आणि काँग्रेसमध्ये आगामी लोकसभा निवडणूका जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी एकीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी जोरदार प्रयत्न करत असतांनाच,काँग्रेसने प्रियंका गांधीना उत्तर प्रदेशच्या राजकारणात उतरवून भाजप आणि मोदींना मोठा झटका दिला आहे.इंदीरा गांधीचे सगळे गुण प्रियंकात असल्याने राहूल गांधी ऐवजी प्रियंका गांधीनी काँग्रेसची धूरा सांभाळावी अशी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची मागणी होती.त्यामुळे उशीरा का होईना प्रिंयका गांधीची राजकारणात प्रवेश झाला आहे.त्यामुळे प्रिंयका गांधीच्या राजकारणातील प्रवेशाचा शुभांरभ काँग्रेसच्या पंरपंरेप्रमाणे नंदूरबार मधून व्हावा अशी काँग्रेसच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची इच्छा आहे.गांधी कुटूंब आणि नंदूरबारमधील आदिवासींचे एक वेगळे नाते आहे.स्व.इंदिरा गांधी,स्व.राजीव गांधी,सोनिया गांधी यांनी नंदूरबार मधून सभा घेवूनच घवघवीत यश मिळवले आहे.विशेष म्हणजे सोनिया गांधीच्या राजकारणातील प्रवेशाची पहिली सभाही नंदूरबारमध्येच झाली होती.नंदूरबार हा आदिवासी जिल्हा असल्याने येथील आदिवासींचे काँग्रेसवर विशेष प्रेम आहे.परंतु,गेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा हा गडही कोसळला होता.त्यामुळे प्रथमच काँग्रसला येथे पराभवाचा सामना करावा लागला होता.त्यामुळे हे अपयश धुवून काढण्यासाठी प्रियंका गांधीच्या रुपाने काँग्रेससमोर संधी चालून आहे.प्रियंका गांधीचा राजकारणातील प्रवेश आणि लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ नंदूरबार जिल्ह्यातून व्हावा यासाठी नंदूरबार मधील काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केला आहे.काँग्रेसचे लोकसभेसाठीचे इच्छुक उमेदवार आमदार के.सी.पाडवी आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी प्रियंका गांधीसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला साकडे घातले आहे.त्यामुळे याबाबत काँग्रेस काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.
काँग्रेसची रणनिती
दरम्यान प्रदेश काँग्रेसकडूनही राज्यातील काँग्रेसच्या लोकसभा निवडणूकीतील प्रचाराचा श्री गणेशा नंदूरबारमधूनच व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.त्यासाठी नंदूरबार मधील काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा लवकरच केली जाणार असून या घोषणेनंतर लगेचच राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांची एकत्रीत सभा नंदूरबारमध्ये घेण्याचा प्रदेश काँग्रेसचा विचार आहे.त्यासाठी पक्षाकडून रणनिती आखली जात आहे.त्यामुळे या सभेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
गांधी कुटूंब आणि नंदूरबारमधील आदिवासींचे एक अतुट नाते राहीले असून लोकसभा असो की,विधानसभा गांधी कुटूंबाकडून प्रचाराचा नारळ नंदूरबार मधूनच फोडला जातो.इंदीरा गांधीपासूनची ही परंपरा आजही कायम असून आता सोनिया गांधीपाठोपाठ प्रियंका गांधीचे राजकारणातील पदार्पण आता नंदूरबार मधूच करण्याची तयारी सुरू आहे. देशातील लोकसभेच्या प्रचाराचा नारळ प्रियंका गांधीच्या हस्ते नंदूरबारमधून फुटावा यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी प्रियंकालाच साकडे घालण्यात आले आहे.त्यासाठी प्रियंका गांधीसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पत्र पाठवण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूकांचा बिगूल वाजण्यास सुरूवात झाली असून भाजप आणि काँग्रेसमध्ये आगामी लोकसभा निवडणूका जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी एकीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी जोरदार प्रयत्न करत असतांनाच,काँग्रेसने प्रियंका गांधीना उत्तर प्रदेशच्या राजकारणात उतरवून भाजप आणि मोदींना मोठा झटका दिला आहे.इंदीरा गांधीचे सगळे गुण प्रियंकात असल्याने राहूल गांधी ऐवजी प्रियंका गांधीनी काँग्रेसची धूरा सांभाळावी अशी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची मागणी होती.त्यामुळे उशीरा का होईना प्रिंयका गांधीची राजकारणात प्रवेश झाला आहे.त्यामुळे प्रिंयका गांधीच्या राजकारणातील प्रवेशाचा शुभांरभ काँग्रेसच्या पंरपंरेप्रमाणे नंदूरबार मधून व्हावा अशी काँग्रेसच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची इच्छा आहे.गांधी कुटूंब आणि नंदूरबारमधील आदिवासींचे एक वेगळे नाते आहे.स्व.इंदिरा गांधी,स्व.राजीव गांधी,सोनिया गांधी यांनी नंदूरबार मधून सभा घेवूनच घवघवीत यश मिळवले आहे.विशेष म्हणजे सोनिया गांधीच्या राजकारणातील प्रवेशाची पहिली सभाही नंदूरबारमध्येच झाली होती.नंदूरबार हा आदिवासी जिल्हा असल्याने येथील आदिवासींचे काँग्रेसवर विशेष प्रेम आहे.परंतु,गेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा हा गडही कोसळला होता.त्यामुळे प्रथमच काँग्रसला येथे पराभवाचा सामना करावा लागला होता.त्यामुळे हे अपयश धुवून काढण्यासाठी प्रियंका गांधीच्या रुपाने काँग्रेससमोर संधी चालून आहे.प्रियंका गांधीचा राजकारणातील प्रवेश आणि लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ नंदूरबार जिल्ह्यातून व्हावा यासाठी नंदूरबार मधील काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केला आहे.काँग्रेसचे लोकसभेसाठीचे इच्छुक उमेदवार आमदार के.सी.पाडवी आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी प्रियंका गांधीसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला साकडे घातले आहे.त्यामुळे याबाबत काँग्रेस काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.
काँग्रेसची रणनिती
दरम्यान प्रदेश काँग्रेसकडूनही राज्यातील काँग्रेसच्या लोकसभा निवडणूकीतील प्रचाराचा श्री गणेशा नंदूरबारमधूनच व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.त्यासाठी नंदूरबार मधील काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा लवकरच केली जाणार असून या घोषणेनंतर लगेचच राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांची एकत्रीत सभा नंदूरबारमध्ये घेण्याचा प्रदेश काँग्रेसचा विचार आहे.त्यासाठी पक्षाकडून रणनिती आखली जात आहे.त्यामुळे या सभेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.