म.टा.वृत्तसेवा,शिर्डी
शिर्डी विमानतळ परिसराला धुक्याने लपेटलेली चादर कायम राहिल्याने मागील दोन दिवसांपासून विमानसेवा ठप्प झाली आहे. सर्व २८ फ्लाईटस रद्द झाल्याने साई मंदिर दर्शनास येणाऱ्या धनाढ्य साईभक्तांचे मोठे हाल झाले आहेत. आज शनिवारचे हवामान खराबच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने तिसऱ्या दिवशीही विमान सेवा ठप्पच राहील अशी भीती विमानतळ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
शिर्डी विमानतळ सेवेला धुक्याचा मोठा फटका बसला आहे. विमाने उतरण्यासाठी आणि उड्डाणासाठी विमानतळाच्या किमान पाच कि.मी. परिसारत हवामान परिसरात स्वच्छ असावे लागते मात्र मागील दोन दिवसा पासून दृश्यमानता तीन किलो मीटरपेक्षा पुढे सरकत नाही अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्री यांनी सांगितले. शास्री म्हणाले, ढगाळ हवामानामुळे विमानतळ परिसरात दिवसभर धुके असल्याने मागील दोन दिवसापासून विमानसेवा ठप्प झाली आहे. मुंबई.दिल्ली, हैदराबाद,बंगलोर,चेन्नई, भोपाल,इंदोर या शहरातून शिर्डीसाठी विमानसेवा सुरु आहे.रोज एकूण २८ विमानाची ये-जा सुरु असते मात्र धुक्यामुळे मागील दोन दिवसापासून विमानसेवा ठप्प पडली आहे असे ते म्हणाले.आज शनिवारचे हवामान खराबच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने तिसऱ्या दिवशीही विमान सेवा ठप्पच राहील अशी भीती विमानतळ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. विमानसेवा ठप्प झाल्याने शिर्डीला येणाऱ्या देश-विदेशातील प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे.
शिर्डी विमानतळ परिसराला धुक्याने लपेटलेली चादर कायम राहिल्याने मागील दोन दिवसांपासून विमानसेवा ठप्प झाली आहे. सर्व २८ फ्लाईटस रद्द झाल्याने साई मंदिर दर्शनास येणाऱ्या धनाढ्य साईभक्तांचे मोठे हाल झाले आहेत. आज शनिवारचे हवामान खराबच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने तिसऱ्या दिवशीही विमान सेवा ठप्पच राहील अशी भीती विमानतळ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
शिर्डी विमानतळ सेवेला धुक्याचा मोठा फटका बसला आहे. विमाने उतरण्यासाठी आणि उड्डाणासाठी विमानतळाच्या किमान पाच कि.मी. परिसारत हवामान परिसरात स्वच्छ असावे लागते मात्र मागील दोन दिवसा पासून दृश्यमानता तीन किलो मीटरपेक्षा पुढे सरकत नाही अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्री यांनी सांगितले. शास्री म्हणाले, ढगाळ हवामानामुळे विमानतळ परिसरात दिवसभर धुके असल्याने मागील दोन दिवसापासून विमानसेवा ठप्प झाली आहे. मुंबई.दिल्ली, हैदराबाद,बंगलोर,चेन्नई, भोपाल,इंदोर या शहरातून शिर्डीसाठी विमानसेवा सुरु आहे.रोज एकूण २८ विमानाची ये-जा सुरु असते मात्र धुक्यामुळे मागील दोन दिवसापासून विमानसेवा ठप्प पडली आहे असे ते म्हणाले.आज शनिवारचे हवामान खराबच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने तिसऱ्या दिवशीही विमान सेवा ठप्पच राहील अशी भीती विमानतळ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. विमानसेवा ठप्प झाल्याने शिर्डीला येणाऱ्या देश-विदेशातील प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे.