मटा फोकस
--
महसूल प्रचंड, तरीही समस्या उदंड
--
मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी ख्याती असलेल्या नाशिकमध्ये देशभरातून हजारो प्रवासी प्रामुख्याने रेल्वेने येतात. परंतु, येथील रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. येथून दररोज सुमारे वीस हजार प्रवासी प्रवास करतात. महिन्याला नऊ ते अकरा कोटींचा मोठा महसूल मिळतो. मात्र, तरीही येथे सरकते जिने, प्रवाशांची सुरक्षा, गर्दीचे व्यवस्थापन, पंचवटीला होणारा विलंब, लांबपल्ल्याच्या गाड्यांना थांबा नसणे, विविध एक्स्प्रेसमध्ये बोगींची कमतरता, नाशिक-पुणे रेल्वे मार्ग यांसारख्या सुविधांप्रश्नी तातडीने उपाययोजनांची गरज आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करून जातात. गैरसाेयी दूर करण्याचे आश्वासनही देतात. परंतु, त्याची अंमलबजावणी अभावानेच होते.
--
संकलन ः डॉ. बाळकृष्ण शेलार
--
प्रवाशांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष
नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात महिनाभरापूर्वी रात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाले होते. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. रेल्वे स्टेशन परिसरात ३० मार्च २०१६ रोजी अकरा जिलेटिन आणि पंचवीस डिटोनेटर वेळीच जप्त करण्यात आल्याने दुर्घटना टळली. दुसऱ्याच दिवशी कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. मात्र, असे प्रकार घडूनदेखील येथे मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या तोकडी आहे. मुख्य प्रवेशद्वारात असणारे मेटल डिटेक्टर व स्कॅनर अनेकदा बंद असतात. सिन्नर फाटा, देवी चौक, पार्सल ऑफिस मार्गावर सुरक्षा यंत्रणा नाही. पोलिस व सुरक्षा बलाची संख्या तोकडी आहे. श्वान पथक, बॉम्बशोध पथकाचा अभाव आहे. कुंभमेळ्यानंतर सीसीटीव्ही कक्ष बंद झाला आहे. यावरून प्रवाशांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचेच अधोरेखित होते.
--
स्टेशनवर डझनभर प्रवेश मार्ग
हे स्टेशन संवेदनशील भागात आहे. मात्र, तरीही त्याला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नाही. त्यामुळे समाजकंटक घुसखोरी करतात. येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यांना नेहमीच्या पश्चिम भागातून प्रवेशासाठी तिकीट विक्री, तसेच तिकीट आरक्षण, पार्सल विभाग, मालधक्का, सुभाषरोड, देवी चौकातील पूल असे अर्धा डझन मार्ग आहेत. पूर्वेला सिन्नर फाटा व शेजारील अनेक भागातून स्थानकात सहज प्रवेश करता येतो. कुंभमेळ्यात अनेक ठिकाणी मुंबईच्या कंपनीद्वारे मेटल डिटेक्टर लावण्यात आले. सिंहस्थ पर्वणी संपताच ते काढण्यात आले. सिन्नर फाटा प्रवेशद्वार तर सताड उघडे असते. कुंभमेळ्यात स्थानकासह परिसरात किमान १०० सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. त्यासाठी स्वतंत्र खोलीत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. आता हा कक्ष बंदच असतो.
--
गर्दीच्या व्यवस्थापनाचा अभाव
येथून दररोज शंभरावर रेल्वेगाड्या धावतात. जंक्शन नसतानाही सकाळी व सायंकाळी पाच ते दहापर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे पादचारी पूल खूपच तोकडा ठरतो. जिन्यांची चढणही अवघड असल्याने गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊ शकते. प्रवासी रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. येथे तीन पादचारी पूल होते. चौथा पूल कुंभमेळ्यात उभारण्यात आला. तो प्लॅटफर्म एकवरून सुरू होऊन चारपर्यंत जातो. हा पूल अन्य पादचारी पुलांना जोडल्यास गर्दीचे व्यवस्थापन होऊ शकते. तसा प्रस्ताव दाखल झाला असला, तरी त्यावर निर्णय होणे बाकी आहे.
--
रुग्णवाहिकेअभावी जिवाशी खेळ
रेल्वे स्टेशनवर २४ तास वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका ठेवावी लागते. प्रवाशाने पुढील स्टेशनवर उपचार देण्याची विनंती केली, तर डॉक्टरांना समवेत जावे लागते. मात्र, नाशिकरोड स्टेशनवर रुग्णवाहिकाच नाही. रेल्वेखाली कोणी ठार झाले, तर पोलिस व हमालच मृतदेहाचे अवशेष गोळा करतात. कुंभमेळ्यात खासदारांच्या हस्ते स्वयंसेवी रुग्णवाहिकेचे उद्घाटन झाले. मात्र, ती बंद पडली. अनेक रेल्वेगाड्यांमध्ये पिण्याचे पाणी नसते. स्टेशनवरील हॉटेलमधील अन्नाचा दर्जाही सुमार असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी गेल्याच महिन्यात चालकाला दंड केला होता.
--
सरकत्या जिन्यांची निकड
अंध, दिव्यांग, ज्येष्ठांसाठी नाशिकरोड स्टेशनवर दोन लिफ्ट नुकत्याच कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परंतु, अन्य प्रवाशांना येथील उंच व अरुंद जिने चढताना त्रास होतो. गर्दीच्या वेळी मुंबईसारखी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडू शकते. मुंबईतील दुर्घटनेनंतर नाशिकच्या प्रवाशांसाठी तातडीने सरकते जिने मंजूर करण्यात आले खरे. तथापि, लिफ्टप्रमाणे त्याला वर्षभराचा विलंब होऊ नये, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
--
राज्यांतर्गत गाड्यांत अपुऱ्या बोगी
नाशिक ते भुसावळदरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठा आहे. भुसावळ पॅसेंजर त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत बोगींची संख्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. देवळाली कॅम्पहून पहाटे साडेचारला सुटणाऱ्या या पॅसेंजरला प्रचंड गर्दी असते. खान्देशाचा दोनशे-अडीचशे किलोमीटरचा प्रवास हा फक्त चाळीस ते पन्नास रुपयांत होत असल्याने या गाडीला गर्दी होणे क्रमप्राप्त आहे. जळगाव, भुसावळला जाण्यासाठी काशी, भागलपूर, पुष्पक, गोरखपूर, पाटणा, गोदान या लांबपल्ल्याच्या गाड्या आहेत. मात्र, त्यांचे तिकीटही अधिक आहे. या गाड्यांमध्ये परराज्यांतील प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे भुसावळ पॅसेंजरच्या बोगी वाढवाव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. मराठवाड्याला जाणाऱ्या व येणाऱ्यांसाठी तपोवन व जनशताब्दी या दोनच गाड्या दररोज धावतात. त्यामुळे त्यांना बाराही महिने गर्दी असते. या गाड्यांची बोगी संख्या वाढविण्याची मागणी आहे. रेल्वे गाड्यांना होणारा विलंब ही नाशिकच्या प्रवाशांची जुनीच तक्रार आहे. इगतपुरी ते कसारादरम्यान अनेकदा अपघातामुळे वाहतूक विस्कळीत होते. गाड्यांना विलंब होतो. नोकरी, व्यवसायानिमित्ताने पंचवटी, गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेसने मुंबईला अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांनी याप्रश्नी अनेकदा आंदोलने केली तरीही प्रशासन बोध घेत नाही. फक्त नाशिकच्या पासधारकांसाठी पंचवटी एक्स्प्रेसला स्वतंत्र बोगी जोडल्याने पासधारकांची सोय झाली आहे.
--
अस्वच्छता, दुर्गंधीच्या गर्तेत
नाशिकरोड स्टेशन गेली दोन वर्षे स्वच्छतेबाबत देशात पहिल्या दहा स्थानकांत होते. यंदा ते १६९ क्रमांकावर पोहोचले आहे. नाशिकरोड स्टेशनवर स्वच्छतागृहे आहेत. परंतु, त्यासाठी शुल्क आहे. पहिल्या प्लॅटफॉर्मवर तिकीट बुकिंग, पार्सल ऑफिस येथील स्वच्छतागृहांचा वापर प्रामुख्याने होतो. दिव्यांगांसाठी चौथ्या प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह आहे. तेथेपर्यंत जाणे त्यांना जिकिरीचे ठरते. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. भिकारी, गर्दुले कुठेही घाण करीत असल्याची स्थिती येथे दिसून येते. त्यामुळे हे स्टेशन अस्वच्छता, दुर्गंधीच्या गर्तेत सापडल्याच दिसून येते.
---
पार्किंग, वेटिंग रूमची समस्या
या स्टेशनसाठी देवी चौक, पार्सल ऑफिस आणि सुभाषरोडवर पार्किंग आहे. प्रवाशांची संख्या वाढतच असल्याने हे तीनही पार्किंग अपुरे पडू लागले आहेत. तीनपैकी फक्त एकच पार्किंग कारसाठी आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी कायम असते. दिव्यांगांच्या वाहनांसाठी असलेल्या पार्किंगमध्येही घुसखोरी वाढली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही वाहनांसाठी पार्किंग शोधावे लागते. रेल्वे फलाटावर पार्किंग होणे ही धोकादायक बाब ठरू लागली आहे. स्टेशनवर प्रवाशांसाठी वेटिंग रूम आहे. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत ते अपुरे पडते. वेटिंग रूममध्ये सामान्य प्रवासीदेखील घुसखोरी करतात. येथे प्रवाशांचे साहित्य ठेवण्यासाठी पुरेसे लॉकर नसल्याने प्रवाशांचे साहित्य चोरी होण्याचे प्रकार घडताना दिसतात. त्यामुळे नवीन वेटिंग रूम बांधावी, लॉकर्स उपलब्ध करावेत, सुरक्षारक्षक नेमावेत अशा मागण्या होत आहेत.
---
पोलिस, नशेखोर अन् अतिक्रमणे
स्टेशनची सुरक्षा रेल्वे सुरक्षा बलाकडे आहे. त्यांच्या मदतीला राज्याचे लोहमार्ग पोलिस स्टेशन आहे. पन्नासहून अधिक संख्या असलेल्या या पोलिसांसाठी खुराड्यासारखे कार्यालय आहे. येथे पोलिसांनाच बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे तक्रारदार उभेच राहतात. महिला पोलिसांसाठी चेंजिग रूम नाही. स्वच्छतागृह, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पोलिसांची निवासस्थानेही छोटी आहेत. दुसरीकडे या स्टेशनवर नशाबाजांचा वाढता वावर दिसून येतो. रात्री प्रवाशांना लुटलेही जाते. दोन वर्षांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर स्टेशनशेजारी बलात्कार झाला होता. त्यानंतर बीडहून आलेल्या प्रशिक्षणार्थी गरोदर महिला पोलिस उपनिरीक्षाचा सर्वांदेखत विनयभंग करण्यात आला होता. त्यांचा बंदोबस्त करणे पोलिसांनाही कठीण होऊन बसले आहे. या स्टेशनला सर्व बाजूंनी अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. स्टेशनवरच नव्हे, तर प्लॅटफॉर्मवरही वाहने बेकायदा पार्क केली जातात. परिणामी प्रवाशांना स्टेशनमध्ये प्रवेश करून बाहेर पडणे अवघड होत आहे.
--
नाशिक-पुणे मार्गाची प्रतीक्षा
नाशिककरांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी या अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद झाली, एक कोटीची टोकन रक्कम मिळाली. परंतु, काम सुरू होत नाही. नाशिक-पुणे-मुंबई हा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखला जातो. तो राष्ट्रीय महामार्गाने जोडला जात आहे. त्याचबरोबर रेल्वेमार्गेही जोडणे आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास नाशिकच्या दळणवळण, व्यापार व उद्योगाचा फायदा होईल.
--
राजधानी एक्स्प्रेसची गरज
मुंबईहून सुटणाऱ्या, परंतु नाशिकरोडला न थांबणाऱ्या दहाहून अधिक गाड्या आहेत. या गाड्यांना नाशिकरोडसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबा देण्याची गरज आहे. निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी मंगळवारी मुंबईहून नाशिकमार्गे दिल्लीला जाते. ही गाडी नियमित सुरू करावी, तसेच नाशिकला थांबवावी, अशीदेखील मागणी आहे. मुंबईहून अंत्योदय सुरू करण्यात आली असून, ती झारखंडला टाटानगर येथे जाते. तिलाही नाशिकरोडला थांबा हवा. गुजरातमार्गे तीन राजधानी एक्स्प्रेस आहेत. परंतु, नाशिकमार्गे एकही नाही. नाशिकरोडला मध्य रेल्वे मार्गाने दिल्लीला जाणारी राजधानीसारखी जलद एक्स्प्रेस मिळाल्यास ठाणे, कल्याण, नाशिक, धुळे, जळगाव, भुसावळ या शहरांना लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
--
प्रवाशांचीही सुविधांकडे पाठ
रेल्वेने नाशिकरोडला प्रवाशांसाठी काही चांगल्या सुविधा दिसलेल्या आहेत. रेल्वेने येथे पैसे टाकून तिकीट घेण्याची दोन व्हेंडिंग मशिन्स बसविली. मात्र, प्रवासी त्याकडे फिरकतच नसल्याने एक मशिन मुंबईला हलविण्यात आले. कार्ड स्वॅप करून तिकीट काढण्याचीही सोय आहे. त्यालाही प्रतिसाद कमी असतो. येथे एक रुपयात मशिनद्वारे बाटलीभर मिनरल वॉटर मिळते. परंतु, प्रवासी त्याकडेही जात नाहीत. नाशिकरोड वाणिज्य निरीक्षकांच्या हद्दीतील घोटी, अस्वली, लहवित, ओढा, कसबे-सुकेणे, निफाड आणि उगाव या स्टेशन्सवर येस बँकेच्या मदतीने वॉटर प्युरिफायरच्या साहाय्याने शुद्ध पाणी देण्याचा श्रीगणेशा झाला आहे.
--
लिफ्ट आहे, पण...
अंध, दिव्यांग, ज्येष्ठ प्रवाशांना जिन्याने जावे लागू नये, तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चार महिन्यांपूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनवर लिफ्ट कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची सोय झाली आहे. या लिफ्टचा वापर वाढला आहे. सकाळी व सायंकाळी प्रचंड गर्दीच्या वेळी लिफ्टमुळे सोय होते. परंतु, अन्य वेळी पुरेसा वापर होत नाही. स्टेशनवरील चौथ्या प्लॅटफॉर्मचादेखील पुरेसा वापर व्हावा, या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे.
--
नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये पुरेसे मेटल डिटेक्टर, स्कॅनिंग मशिन्स व सीसीटीव्ही कार्यान्वित करावेत. लांबपल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबा द्यावा. नाशिक-पुणे मार्गासारखे प्रकल्प लवकर व्हावेत. सरकते जिने बसवावेत.
-राजेंद्र जाधव
--
रेल्वेने खाद्यपदार्थांच्या दर्जाची तपासणी करावी. स्टेशनवरील नशेबाज व गुंडांचा बंदोबस्त करावा. परिसरातील पार्किंग समस्या निकाली काढावी. आरक्षण तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठी उपाय योजावेत.
-बाळनाथ सरोदे
--
महसूल प्रचंड, तरीही समस्या उदंड
--
मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी ख्याती असलेल्या नाशिकमध्ये देशभरातून हजारो प्रवासी प्रामुख्याने रेल्वेने येतात. परंतु, येथील रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. येथून दररोज सुमारे वीस हजार प्रवासी प्रवास करतात. महिन्याला नऊ ते अकरा कोटींचा मोठा महसूल मिळतो. मात्र, तरीही येथे सरकते जिने, प्रवाशांची सुरक्षा, गर्दीचे व्यवस्थापन, पंचवटीला होणारा विलंब, लांबपल्ल्याच्या गाड्यांना थांबा नसणे, विविध एक्स्प्रेसमध्ये बोगींची कमतरता, नाशिक-पुणे रेल्वे मार्ग यांसारख्या सुविधांप्रश्नी तातडीने उपाययोजनांची गरज आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करून जातात. गैरसाेयी दूर करण्याचे आश्वासनही देतात. परंतु, त्याची अंमलबजावणी अभावानेच होते.
--
संकलन ः डॉ. बाळकृष्ण शेलार
--
प्रवाशांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष
नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात महिनाभरापूर्वी रात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाले होते. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. रेल्वे स्टेशन परिसरात ३० मार्च २०१६ रोजी अकरा जिलेटिन आणि पंचवीस डिटोनेटर वेळीच जप्त करण्यात आल्याने दुर्घटना टळली. दुसऱ्याच दिवशी कामायनी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. मात्र, असे प्रकार घडूनदेखील येथे मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या तोकडी आहे. मुख्य प्रवेशद्वारात असणारे मेटल डिटेक्टर व स्कॅनर अनेकदा बंद असतात. सिन्नर फाटा, देवी चौक, पार्सल ऑफिस मार्गावर सुरक्षा यंत्रणा नाही. पोलिस व सुरक्षा बलाची संख्या तोकडी आहे. श्वान पथक, बॉम्बशोध पथकाचा अभाव आहे. कुंभमेळ्यानंतर सीसीटीव्ही कक्ष बंद झाला आहे. यावरून प्रवाशांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचेच अधोरेखित होते.
--
स्टेशनवर डझनभर प्रवेश मार्ग
हे स्टेशन संवेदनशील भागात आहे. मात्र, तरीही त्याला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नाही. त्यामुळे समाजकंटक घुसखोरी करतात. येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यांना नेहमीच्या पश्चिम भागातून प्रवेशासाठी तिकीट विक्री, तसेच तिकीट आरक्षण, पार्सल विभाग, मालधक्का, सुभाषरोड, देवी चौकातील पूल असे अर्धा डझन मार्ग आहेत. पूर्वेला सिन्नर फाटा व शेजारील अनेक भागातून स्थानकात सहज प्रवेश करता येतो. कुंभमेळ्यात अनेक ठिकाणी मुंबईच्या कंपनीद्वारे मेटल डिटेक्टर लावण्यात आले. सिंहस्थ पर्वणी संपताच ते काढण्यात आले. सिन्नर फाटा प्रवेशद्वार तर सताड उघडे असते. कुंभमेळ्यात स्थानकासह परिसरात किमान १०० सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. त्यासाठी स्वतंत्र खोलीत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. आता हा कक्ष बंदच असतो.
--
गर्दीच्या व्यवस्थापनाचा अभाव
येथून दररोज शंभरावर रेल्वेगाड्या धावतात. जंक्शन नसतानाही सकाळी व सायंकाळी पाच ते दहापर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे पादचारी पूल खूपच तोकडा ठरतो. जिन्यांची चढणही अवघड असल्याने गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊ शकते. प्रवासी रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. येथे तीन पादचारी पूल होते. चौथा पूल कुंभमेळ्यात उभारण्यात आला. तो प्लॅटफर्म एकवरून सुरू होऊन चारपर्यंत जातो. हा पूल अन्य पादचारी पुलांना जोडल्यास गर्दीचे व्यवस्थापन होऊ शकते. तसा प्रस्ताव दाखल झाला असला, तरी त्यावर निर्णय होणे बाकी आहे.
--
रुग्णवाहिकेअभावी जिवाशी खेळ
रेल्वे स्टेशनवर २४ तास वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिका ठेवावी लागते. प्रवाशाने पुढील स्टेशनवर उपचार देण्याची विनंती केली, तर डॉक्टरांना समवेत जावे लागते. मात्र, नाशिकरोड स्टेशनवर रुग्णवाहिकाच नाही. रेल्वेखाली कोणी ठार झाले, तर पोलिस व हमालच मृतदेहाचे अवशेष गोळा करतात. कुंभमेळ्यात खासदारांच्या हस्ते स्वयंसेवी रुग्णवाहिकेचे उद्घाटन झाले. मात्र, ती बंद पडली. अनेक रेल्वेगाड्यांमध्ये पिण्याचे पाणी नसते. स्टेशनवरील हॉटेलमधील अन्नाचा दर्जाही सुमार असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी गेल्याच महिन्यात चालकाला दंड केला होता.
--
सरकत्या जिन्यांची निकड
अंध, दिव्यांग, ज्येष्ठांसाठी नाशिकरोड स्टेशनवर दोन लिफ्ट नुकत्याच कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परंतु, अन्य प्रवाशांना येथील उंच व अरुंद जिने चढताना त्रास होतो. गर्दीच्या वेळी मुंबईसारखी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडू शकते. मुंबईतील दुर्घटनेनंतर नाशिकच्या प्रवाशांसाठी तातडीने सरकते जिने मंजूर करण्यात आले खरे. तथापि, लिफ्टप्रमाणे त्याला वर्षभराचा विलंब होऊ नये, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.
--
राज्यांतर्गत गाड्यांत अपुऱ्या बोगी
नाशिक ते भुसावळदरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठा आहे. भुसावळ पॅसेंजर त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत बोगींची संख्या कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. देवळाली कॅम्पहून पहाटे साडेचारला सुटणाऱ्या या पॅसेंजरला प्रचंड गर्दी असते. खान्देशाचा दोनशे-अडीचशे किलोमीटरचा प्रवास हा फक्त चाळीस ते पन्नास रुपयांत होत असल्याने या गाडीला गर्दी होणे क्रमप्राप्त आहे. जळगाव, भुसावळला जाण्यासाठी काशी, भागलपूर, पुष्पक, गोरखपूर, पाटणा, गोदान या लांबपल्ल्याच्या गाड्या आहेत. मात्र, त्यांचे तिकीटही अधिक आहे. या गाड्यांमध्ये परराज्यांतील प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे भुसावळ पॅसेंजरच्या बोगी वाढवाव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. मराठवाड्याला जाणाऱ्या व येणाऱ्यांसाठी तपोवन व जनशताब्दी या दोनच गाड्या दररोज धावतात. त्यामुळे त्यांना बाराही महिने गर्दी असते. या गाड्यांची बोगी संख्या वाढविण्याची मागणी आहे. रेल्वे गाड्यांना होणारा विलंब ही नाशिकच्या प्रवाशांची जुनीच तक्रार आहे. इगतपुरी ते कसारादरम्यान अनेकदा अपघातामुळे वाहतूक विस्कळीत होते. गाड्यांना विलंब होतो. नोकरी, व्यवसायानिमित्ताने पंचवटी, गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेसने मुंबईला अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांनी याप्रश्नी अनेकदा आंदोलने केली तरीही प्रशासन बोध घेत नाही. फक्त नाशिकच्या पासधारकांसाठी पंचवटी एक्स्प्रेसला स्वतंत्र बोगी जोडल्याने पासधारकांची सोय झाली आहे.
--
अस्वच्छता, दुर्गंधीच्या गर्तेत
नाशिकरोड स्टेशन गेली दोन वर्षे स्वच्छतेबाबत देशात पहिल्या दहा स्थानकांत होते. यंदा ते १६९ क्रमांकावर पोहोचले आहे. नाशिकरोड स्टेशनवर स्वच्छतागृहे आहेत. परंतु, त्यासाठी शुल्क आहे. पहिल्या प्लॅटफॉर्मवर तिकीट बुकिंग, पार्सल ऑफिस येथील स्वच्छतागृहांचा वापर प्रामुख्याने होतो. दिव्यांगांसाठी चौथ्या प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह आहे. तेथेपर्यंत जाणे त्यांना जिकिरीचे ठरते. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. भिकारी, गर्दुले कुठेही घाण करीत असल्याची स्थिती येथे दिसून येते. त्यामुळे हे स्टेशन अस्वच्छता, दुर्गंधीच्या गर्तेत सापडल्याच दिसून येते.
---
पार्किंग, वेटिंग रूमची समस्या
या स्टेशनसाठी देवी चौक, पार्सल ऑफिस आणि सुभाषरोडवर पार्किंग आहे. प्रवाशांची संख्या वाढतच असल्याने हे तीनही पार्किंग अपुरे पडू लागले आहेत. तीनपैकी फक्त एकच पार्किंग कारसाठी आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी कायम असते. दिव्यांगांच्या वाहनांसाठी असलेल्या पार्किंगमध्येही घुसखोरी वाढली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही वाहनांसाठी पार्किंग शोधावे लागते. रेल्वे फलाटावर पार्किंग होणे ही धोकादायक बाब ठरू लागली आहे. स्टेशनवर प्रवाशांसाठी वेटिंग रूम आहे. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत ते अपुरे पडते. वेटिंग रूममध्ये सामान्य प्रवासीदेखील घुसखोरी करतात. येथे प्रवाशांचे साहित्य ठेवण्यासाठी पुरेसे लॉकर नसल्याने प्रवाशांचे साहित्य चोरी होण्याचे प्रकार घडताना दिसतात. त्यामुळे नवीन वेटिंग रूम बांधावी, लॉकर्स उपलब्ध करावेत, सुरक्षारक्षक नेमावेत अशा मागण्या होत आहेत.
---
पोलिस, नशेखोर अन् अतिक्रमणे
स्टेशनची सुरक्षा रेल्वे सुरक्षा बलाकडे आहे. त्यांच्या मदतीला राज्याचे लोहमार्ग पोलिस स्टेशन आहे. पन्नासहून अधिक संख्या असलेल्या या पोलिसांसाठी खुराड्यासारखे कार्यालय आहे. येथे पोलिसांनाच बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे तक्रारदार उभेच राहतात. महिला पोलिसांसाठी चेंजिग रूम नाही. स्वच्छतागृह, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पोलिसांची निवासस्थानेही छोटी आहेत. दुसरीकडे या स्टेशनवर नशाबाजांचा वाढता वावर दिसून येतो. रात्री प्रवाशांना लुटलेही जाते. दोन वर्षांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर स्टेशनशेजारी बलात्कार झाला होता. त्यानंतर बीडहून आलेल्या प्रशिक्षणार्थी गरोदर महिला पोलिस उपनिरीक्षाचा सर्वांदेखत विनयभंग करण्यात आला होता. त्यांचा बंदोबस्त करणे पोलिसांनाही कठीण होऊन बसले आहे. या स्टेशनला सर्व बाजूंनी अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. स्टेशनवरच नव्हे, तर प्लॅटफॉर्मवरही वाहने बेकायदा पार्क केली जातात. परिणामी प्रवाशांना स्टेशनमध्ये प्रवेश करून बाहेर पडणे अवघड होत आहे.
--
नाशिक-पुणे मार्गाची प्रतीक्षा
नाशिककरांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी या अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद झाली, एक कोटीची टोकन रक्कम मिळाली. परंतु, काम सुरू होत नाही. नाशिक-पुणे-मुंबई हा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखला जातो. तो राष्ट्रीय महामार्गाने जोडला जात आहे. त्याचबरोबर रेल्वेमार्गेही जोडणे आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास नाशिकच्या दळणवळण, व्यापार व उद्योगाचा फायदा होईल.
--
राजधानी एक्स्प्रेसची गरज
मुंबईहून सुटणाऱ्या, परंतु नाशिकरोडला न थांबणाऱ्या दहाहून अधिक गाड्या आहेत. या गाड्यांना नाशिकरोडसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी थांबा देण्याची गरज आहे. निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी मंगळवारी मुंबईहून नाशिकमार्गे दिल्लीला जाते. ही गाडी नियमित सुरू करावी, तसेच नाशिकला थांबवावी, अशीदेखील मागणी आहे. मुंबईहून अंत्योदय सुरू करण्यात आली असून, ती झारखंडला टाटानगर येथे जाते. तिलाही नाशिकरोडला थांबा हवा. गुजरातमार्गे तीन राजधानी एक्स्प्रेस आहेत. परंतु, नाशिकमार्गे एकही नाही. नाशिकरोडला मध्य रेल्वे मार्गाने दिल्लीला जाणारी राजधानीसारखी जलद एक्स्प्रेस मिळाल्यास ठाणे, कल्याण, नाशिक, धुळे, जळगाव, भुसावळ या शहरांना लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
--
प्रवाशांचीही सुविधांकडे पाठ
रेल्वेने नाशिकरोडला प्रवाशांसाठी काही चांगल्या सुविधा दिसलेल्या आहेत. रेल्वेने येथे पैसे टाकून तिकीट घेण्याची दोन व्हेंडिंग मशिन्स बसविली. मात्र, प्रवासी त्याकडे फिरकतच नसल्याने एक मशिन मुंबईला हलविण्यात आले. कार्ड स्वॅप करून तिकीट काढण्याचीही सोय आहे. त्यालाही प्रतिसाद कमी असतो. येथे एक रुपयात मशिनद्वारे बाटलीभर मिनरल वॉटर मिळते. परंतु, प्रवासी त्याकडेही जात नाहीत. नाशिकरोड वाणिज्य निरीक्षकांच्या हद्दीतील घोटी, अस्वली, लहवित, ओढा, कसबे-सुकेणे, निफाड आणि उगाव या स्टेशन्सवर येस बँकेच्या मदतीने वॉटर प्युरिफायरच्या साहाय्याने शुद्ध पाणी देण्याचा श्रीगणेशा झाला आहे.
--
लिफ्ट आहे, पण...
अंध, दिव्यांग, ज्येष्ठ प्रवाशांना जिन्याने जावे लागू नये, तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चार महिन्यांपूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनवर लिफ्ट कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची सोय झाली आहे. या लिफ्टचा वापर वाढला आहे. सकाळी व सायंकाळी प्रचंड गर्दीच्या वेळी लिफ्टमुळे सोय होते. परंतु, अन्य वेळी पुरेसा वापर होत नाही. स्टेशनवरील चौथ्या प्लॅटफॉर्मचादेखील पुरेसा वापर व्हावा, या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे.
--
नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये पुरेसे मेटल डिटेक्टर, स्कॅनिंग मशिन्स व सीसीटीव्ही कार्यान्वित करावेत. लांबपल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबा द्यावा. नाशिक-पुणे मार्गासारखे प्रकल्प लवकर व्हावेत. सरकते जिने बसवावेत.
-राजेंद्र जाधव
--
रेल्वेने खाद्यपदार्थांच्या दर्जाची तपासणी करावी. स्टेशनवरील नशेबाज व गुंडांचा बंदोबस्त करावा. परिसरातील पार्किंग समस्या निकाली काढावी. आरक्षण तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठी उपाय योजावेत.
-बाळनाथ सरोदे