म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
जी कला प्रबोधन करते त्या कलेचाच सन्मान झालेला आहे. मात्र, लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकाराला उपेक्षित जीवन जगण्याचे वेळ येत असले तर अशा लोककला जिवंत ठेवण्यात काय अर्थ आहे? ज्या कलांच्या माध्यमातून कला सादर करणाऱ्या माणसाचा उद्धार होत नसल्यास या कलांची जोपासना कशासाठी करायची हा प्रश्न आहे, अशी खंत कवी प्रा. गंगाधर अहिरे यांनी व्यक्त केली.
लोककवी वामनदादा कर्डक, कवी वसंत बापट, शाहीर अमर शेख यांची जयंती व कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मृतीदिनानिमित्त बुधवारी झालेल्या कलावंत पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
पंचवटीतील पलुस्कर सभागृहात झालेल्या कार्यक्रमास शाहीर दत्ता वाघ, नाट्यकलावंत नानाजी शिंदे, रंगभूषाकार माणिक कानडे, कलावत विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोंढे यांच्या उपस्थितीत ‘रखेली आणि निःशस्त्र’ योद्धा या नाटकातील लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य कलावंत तसेच अकोले येथील डॉ. सुनील शिंदे यांना पुरस्कार देण्यात आले.
कलेच्या माध्यमातून प्रबोधन करणे आणि व्यवसाय करणे असे कलेचे दोन रुपं आहेत. प्रबोधन करणाऱ्या कलेला अनेक बंधने असतात. मूळ हेतू जनजागृतीचा असतो. प्रबोधन करणाऱ्या कलाकारांचे आयुष्य भणंग असल्याचेच दिसते. कला माणसाच्या जीवनासाठी की आनंदासाठी, हा वाद आहे. माणसाला लागणारे तत्वज्ञान कथा, कादंबरी, कविता, नाटक यांच्यातून लिहिले जाते. आनंदसाठी असलेल्या कलांना कधी नोबेल मिळालेले नाही.
सुनील मोंढे यांनी प्रास्ताविकात लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने नाशिकला चित्रनगरी व्हावी तसेच त्यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृहाची उभारणी व्हावी यासाठी कलावंत विचार मंच कार्य करीत असल्याचे सांगितले. प्रज्ञा काळे यांनी सूत्रसंचालन केले.
जी कला प्रबोधन करते त्या कलेचाच सन्मान झालेला आहे. मात्र, लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलाकाराला उपेक्षित जीवन जगण्याचे वेळ येत असले तर अशा लोककला जिवंत ठेवण्यात काय अर्थ आहे? ज्या कलांच्या माध्यमातून कला सादर करणाऱ्या माणसाचा उद्धार होत नसल्यास या कलांची जोपासना कशासाठी करायची हा प्रश्न आहे, अशी खंत कवी प्रा. गंगाधर अहिरे यांनी व्यक्त केली.
लोककवी वामनदादा कर्डक, कवी वसंत बापट, शाहीर अमर शेख यांची जयंती व कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मृतीदिनानिमित्त बुधवारी झालेल्या कलावंत पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
पंचवटीतील पलुस्कर सभागृहात झालेल्या कार्यक्रमास शाहीर दत्ता वाघ, नाट्यकलावंत नानाजी शिंदे, रंगभूषाकार माणिक कानडे, कलावत विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सुनील मोंढे यांच्या उपस्थितीत ‘रखेली आणि निःशस्त्र’ योद्धा या नाटकातील लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य कलावंत तसेच अकोले येथील डॉ. सुनील शिंदे यांना पुरस्कार देण्यात आले.
कलेच्या माध्यमातून प्रबोधन करणे आणि व्यवसाय करणे असे कलेचे दोन रुपं आहेत. प्रबोधन करणाऱ्या कलेला अनेक बंधने असतात. मूळ हेतू जनजागृतीचा असतो. प्रबोधन करणाऱ्या कलाकारांचे आयुष्य भणंग असल्याचेच दिसते. कला माणसाच्या जीवनासाठी की आनंदासाठी, हा वाद आहे. माणसाला लागणारे तत्वज्ञान कथा, कादंबरी, कविता, नाटक यांच्यातून लिहिले जाते. आनंदसाठी असलेल्या कलांना कधी नोबेल मिळालेले नाही.
सुनील मोंढे यांनी प्रास्ताविकात लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने नाशिकला चित्रनगरी व्हावी तसेच त्यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृहाची उभारणी व्हावी यासाठी कलावंत विचार मंच कार्य करीत असल्याचे सांगितले. प्रज्ञा काळे यांनी सूत्रसंचालन केले.