अ‍ॅपशहर

मुक्त विद्यापीठात गांधी जीवन ग्रंथप्रदर्शन

म टा...

Maharashtra Times 29 Sep 2018, 4:00 am

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जीवनावरील पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन सुरू करण्यात आले. प्रदर्शन २ ऑक्टोबरपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

विद्यापीठातील वाचनालय व माहिती स्त्रोत केंद्रात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते झाले. महात्मा गांधी अंतर्बाह्य समजून घेण्यासाठी जिज्ञासू वाचकांना या ग्रंथप्रदर्शनाचा निश्चितच फायदा होईल, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले. यावेळी विद्यापीठातील विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे, ग्रंथपाल डॉ. प्रकाश शेवाळे, सहाय्यक ग्रंथपाल प्रकाश बर्वे आदी उपस्थित होते.

मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉ. एस. के. स्वामी यांचे 'पर्यावरण व गांधी विचार' या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित होते. विद्यापीठात २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात होत असलेल्या 'स्वच्छता ही सेवा' पंधरवड्यांगर्तगत व्याख्यान झाले. डॉ. स्वामी यांनी छोट्या-छोट्या गोष्टीतून प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाचे रक्षण कसे करता येते, याविषयीची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते मुकुंद दीक्षित यांनी खादी उद्योगाचे ग्रामीण विकासात असलेले महत्त्व विषद केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठातील संगणक विद्याशाखेतील सहयोगी प्राध्यापक माधव पळशीकर, विद्यापीठातील बीबीए, आयटीआय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासकेंद्राचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज